डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 14 जुलैपर्यंत मुदतवाढ



डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

14 जुलैपर्यंत मुदतवाढ

        वाशिम, दि. 22 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 10 वी, 12 वी व पदवीनंतरच्या विविध स्तरावरील व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे.

          विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करतांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी हा नगरपालिकेच्या क्षेत्रामधील महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा. वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीच्या परिसरातील रहिवासी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका व्यावसायीक/ बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला प्रवेशीत असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्षाचा असावा. दिव्यांगासाठी (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के इतकी राहील. विद्यार्थ्यांना प्रवेशित महाविद्यालयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करावा.

          अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता 14 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे