Posts

विशेष लेख २१ ऑगस्ट जलसंधारण दिन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प..जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण..शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज

Image
विशेष लेख  २१ ऑगस्ट जलसंधारण दिन  ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज पाणी म्हणजे जीवन. शेती, उद्योग, पर्यावरण, मानवी जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्वांचा आधार पाण्यावर आहे. मात्र पावसाचे बदलते स्वरूप, वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन हा केवळ शासनाचा विषय राहिलेला नाही. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचाराला बळ देण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात आहे. मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जात आहे. त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीचे स्मरण करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा संदेश या दिनाच्या माध्यमातून दिला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन ...

💧 ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा!’ — एनसीसी कॅडेट्सचा जलसंवर्धनाचा संदेश 🌱आजचा थेंब वाचवला, तर उद्याचे भविष्य सुरक्षित!

Image
💧 ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा!’ — एनसीसी कॅडेट्सचा जलसंवर्धनाचा संदेश 🌱 आजचा थेंब वाचवला, तर उद्याचे भविष्य सुरक्षित! जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर श्री. बाकलीवाल विद्यालय, वाशीम येथे एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकाराने ‘आजचे जलसंवर्धन उपाय व पाणी बचत’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोस्टर्सच्या माध्यमातून पाणी बचत, मृदसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. 💦🌳 ‘आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य’ ‘थेंब थेंब साठवूया, पाणीटंचाई टाळूया’ ‘माती वाचवूया, भविष्य घडवूया’ या संदेशांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसोबतच त्यांची पर्यावरणाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी ही अधोरेखित केली. 🚶‍♂️🚶‍♀️ २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकथॉन फॉर वॉटर’! एक पाऊल मातीसाठी… एक पाऊल पाण्यासाठी… एक पाऊल सुरक्षित भविष्यासाठी! चला, आपणही सहभागी होऊया… 💧 पाणी अडवूया, पाणी जिरवूया! 🌱 माती वाचवूया, निसर्ग जपूया! 🤝 जलसंवर्धनाची ...

विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या...

Image
विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या... महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्...

महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे— मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Image
महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार   ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड  मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरो’ अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून त्यानंतर सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. *लोकप्रतिनिधी, विद्या...

फक्त २ दिवस बाकी! 'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..!

Image
फक्त २ दिवस बाकी!  'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow