Posts

मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत

Image
मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत     जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा सभा वाशिम,दि.५ मे (जिमाका) मान्सूनपूर्व तयारीला गती देत सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोर नियोजनाने काम करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात  मान्सूनपूर्व आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लता फड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह  विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.  पाटबंधारे व जलसंधारण विभागाने तातडीने ॲक्शन प्लॅन तयार करावा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन   वाशिम, दि. १ मे (जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्याला अधिक प्रगत, समृद्ध आणि आदर्श बनवूया पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन दिन शासकीय समारंभ उत्साहात साजरा पोलीस कवायत मैदान येथेपालकमंत्री यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार शेतकऱ्यांसाठी महाबीजच्या चार महत्त्वपूर्ण उत्पादनांचे लोकार्पण

Image
जिल्ह्याला अधिक प्रगत, समृद्ध आणि आदर्श बनवूया            पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे  महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन दिन शासकीय समारंभ उत्साहात साजरा  पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार  शेतकऱ्यांसाठी महाबीजच्या चार महत्त्वपूर्ण उत्पादनांचे लोकार्पण  वाशिम, दि. १ मे (जिमाका) जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने, समन्वयाने आणि ठोस कृतीतून प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा त्यात तितकाच सहभाग महत्त्वाचा आहे. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत संतुलित प्रगती साधत, स्थानिकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देत आपण पुढे गेलो, तर वाशिम जिल्हा केवळ प्रगतच नव्हे तर समृद्ध आणि आदर्श जिल्हा म्हणून राज्...

खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून  जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी      पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व वेळेत काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खरीप हंगाम, जल जीवन मिशन तसेच विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन सुविधा व कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी, तसेच पीक नियोजनाबाबत प्रभावी मार्गदर्शन देण्यात यावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये आणि खरीप हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचाही आढावा घेऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकर व्यवस्था, जलस्रोत पुनर्भरण, विहिरी व बोअरवेल...

जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवूनस्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन         वाशिम, दि.३० एप्रिल (जिमाका) जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात दि.१ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वतः सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगीन करावे. त्यानंतर लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एस ई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा ११ अंकी क्रमांक दि.१५ मे २०२६ नंतर घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला देवून जनगणना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जनगणना मोहिमेतील स्व-गणना प्रक्रिया सुरक्षित, सुलभ व सोईस्कर आहे. जनगणनेचे संकेतस्थळ इंग्र...