Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक

Image
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक  वाशिम,  (जिमाका) श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.(१४) रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे भेट देत संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार धर्मगुरु बाबु सिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज,महंत शेखर महाराज,महंत सुनील महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतांच्या विचारांचा समाज घडविण्यात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सत्य, अहिंसा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांनी दिला असून, त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा प्...

बंजारा समाजाच्या कायम पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
बंजारा समाजाच्या कायम पाठीशी        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार          उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन वाशिम, (जिमाका)  संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दृरदृश्यप्रणालीव्दारे संदेश देतांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत ...

जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला_कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Image
जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला _कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणार...

घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम,  (जिमाका) शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वाशिम येथे घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन आज दि.(२६) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 'फ्री ऑफ कॉस्ट ' तत्वावर चालविला जाणारा हा विलगीकरणाचा प्रथम प्रकल्प आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी  निलेश गायकवाड, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या  उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. भरणे यांनी केंद्राची पाहणी करून कार्यपद्धतीची राम डोरले यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पालकमंत्री म्हणाले की, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर केल्यास पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध पद्...

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया    पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम,  (जिमाका) जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.        आज दि.(२६) रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अ...