Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जरक्कम ₹२ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त रक्कम भरून तेही कर्जमुक्तीचा लाभ घेऊ शकणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे. #OTS #शेतकरीकल्याण #कर्जमुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार.

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार. #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

विशेष लेख :  महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढउतार आणि वाढते कर्जबाजारीपण या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही लाखो शेतकरी कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. समाजकल्याण, लोकहित आणि न्यायप्रिय प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करत शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि निर्धारित कालावधीत न भरलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जांना या योजनेत समाविष...

आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..!

Image
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..! #आषाढीवारी  #वारी2026  #वारकरी  #महाराष्ट्रशासन  #PandharpurWari  #AshadhiEkadashi   #MahaDGIPR