विशेष लेख २१ ऑगस्ट जलसंधारण दिन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प..जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण..शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज
विशेष लेख २१ ऑगस्ट जलसंधारण दिन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज पाणी म्हणजे जीवन. शेती, उद्योग, पर्यावरण, मानवी जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्वांचा आधार पाण्यावर आहे. मात्र पावसाचे बदलते स्वरूप, वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन हा केवळ शासनाचा विषय राहिलेला नाही. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचाराला बळ देण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात आहे. मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जात आहे. त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीचे स्मरण करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा संदेश या दिनाच्या माध्यमातून दिला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन ...