Posts

विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या...

Image
विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या... महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्...

महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे— मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Image
महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार   ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड  मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरो’ अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून त्यानंतर सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. *लोकप्रतिनिधी, विद्या...

फक्त २ दिवस बाकी! 'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..!

Image
फक्त २ दिवस बाकी!  'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार

Image
वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार वाशिम, दि. १८ ऑगस्ट (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण ४८ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे एमआयडीसीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. वाशिम एमआयडीसीमधील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयडीसीच्या विकासासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाशिम एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी १८ कोटी रुपये, तर पाणीपुरवठा सुविधांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे....

आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे.

Image
आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. “चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी ...