Posts

जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला_कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Image
जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला _कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणार...

घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम,  (जिमाका) शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वाशिम येथे घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन आज दि.(२६) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 'फ्री ऑफ कॉस्ट ' तत्वावर चालविला जाणारा हा विलगीकरणाचा प्रथम प्रकल्प आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी  निलेश गायकवाड, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या  उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. भरणे यांनी केंद्राची पाहणी करून कार्यपद्धतीची राम डोरले यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पालकमंत्री म्हणाले की, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर केल्यास पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध पद्...

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया    पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम,  (जिमाका) जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.        आज दि.(२६) रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अ...

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

Image
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे  ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी  हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम   नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली. या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ....

विशेष लेख : हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

Image
विशेष लेख :   हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक   शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.   श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.   श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबि...