Posts

Showing posts from 2019

नामनिर्देशन पत्रांची मंगळवारी होणार छाननी

वाशिम जिल्हा परिषद , पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक वाशिम , दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक कार्यक्रमानुसार १८ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार, २४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ डिसेंबर २०१९ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध कराण्यात येईल. ज्याठिकाणी अपील दाखल झाले आहे, अशा ठिकाणी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाईल. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ३.३० वा. नंतर व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३.३० वा. नंतर निवडणूक लढविणाऱ्या उम

वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्त

Image
वाशिम , दि. २३ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (भ्रमणध्वनी क्र. ९८४५५६८९१७) हे मुख्य निवडणूक निरीक्षक असतील. वाशिम , रिसोड व मालेगाव पंचायत समिती निवडणुकीकरिता प्रमोदसिंह दुबे (भ्रमणध्वनी क्र. ९८२२५९३०२३) यांची तर कारंजा , मंगरुळपीर व मानोरा पंचायत समिती निवडणुकीकरिता एन. के. लोणकर (भ्रमणध्वनी क्र. ७५८८८७३४६९) यांची निवडणूक निरीक्षक   म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे , असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

जिल्ह्यात ७ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम , दि. २३ : जिल्ह्यात २५ डिसेंबर २०१९ क्रोजी ख्रिश्चन बांधवांतर्फे नाताळ सण साजरा करण्यात येतो. ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी नववर्षाचे स्वागत करण्याकरिता विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. १९ नोव्हेंबर २०१९ रोजीपासून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २४ डिसेंबर २०१९ ते ७ जानेवारी २०२० दरम्यान वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे. या कालावधीत शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे , कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे , दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे , जमा करणे किंवा तयार करणे ,   व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे , वाद्य वाजविणे , किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घो

वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
·         रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार ·         सौर कृषिपंप वापरावर भर देणार ·         ग्रामीण भागातील रस्ते सुधारणार ·         रुग्णालयासाठी निधी देणार नागपूर, दि. १८ : राज्यातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक असलेल्या वाशिम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांखाली निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसले तरी लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. अडाण

केंद्रीय पथकाने केली वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी

Image
वाशिम , दि. २४ : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक गठीत केले आहे. या पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची आज, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व झालेल्या पीक नुकसानीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. श्री. गायकवाड यांनी ३ हेक्टरमध्ये सोयाबीन

बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आजपासून आयोजन

Image
वाशिम , दि. १३ : जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत बालकांचे हक्क व सुरक्षितता याबाबत विविध कायदे , विधी संघर्षग्रस्त बालक , बालकांचे हकक , बालकामगार , बालविवाह , बालकांवरील लैंगिक अत्याचार , मादक द्रव्यांचा गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सप्ताह आयोजनासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, डायटच्या अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुलकर्णी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप राठोड, अॅड. गजेंद्र सरपाते, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक महेश राऊत, अमोल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, राज्यात ‘सर्वत्र बालकांची सुरक्षितता’ अर्थात बालकांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भात १४ ते २० नोव्हे

पीक नुकसानीच्या पंचनाम्याची डाटा एन्ट्री अचूक करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
वाशिम , दि. ०७ : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. प्रत्येक पंचनाम्याची डाटा एन्ट्री करणे आवश्यक असून यामध्ये सर्व माहिती अचूक भरली जाईल, याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचनामे डाटा एन्ट्री विषयक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधक आर. एल. गडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासन व विमा कंपनीला पाठविण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने विहित नमुन्यात भरणे व बाधित पिकांचे फोटो सादर करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित तलाठी,

१९३ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

·          ८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी सुद्धा पोटनिवडणूक ·          निवडणुकीची नोटीस आज होणार प्रसिद्ध; ८ डिसेंबर रोजी मतदान वाशिम , दि. ०५ : राज्य निवडणूक आयोगाने  वाशिम  जिल्ह्यातील१९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच , सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती , घोषणा मंत्री , खासदार , आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही , असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर २०१९ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. पोट निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र १६ ते २१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वा. दरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. २५ नोव्

पीक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          प्रत्यक्ष बांधावर जावून पंचानाम्यांच्या अचूकतेची केली पडताळणी ·          शेतकऱ्यांशी साधला संवाद; नुकसानीची घेतली माहिती ·          विहित मुदतीत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना वाशिम , दि. ०५ : पंचनाम्यातील त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. वाशिम तालुक्यातील सुराळा, कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पंचनामे अचूक होण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी काही पंचानाम्यांची पडताळणी केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, गट विकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्यासह महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या व या योजनेत सहभागी न झालेल्या अशा सर्वच

खचून जावू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे !

Image
·          नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पालकमंत्री संजय राठोड यांचा संवाद ·             परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी ·             वाशिम जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देणार वाशिम , दि. ०२ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन तसेच काढणी झालेल्या सोयाबीनसह इतरही भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. मात्र शेतकऱ्यांनी या संकटामुळे खचून न जाता त्याचा धीराने सामना करावा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देवून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. राठोड आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिक

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्कर बजावितांना मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या ११ पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट , वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन , सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र) , छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक , पॅन कार्ड , एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड , मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड , भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड , छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्रे , खासदार किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे. निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली छायाचि

११ हजार विद्यार्थ्यांनी, महिलांनी मानवी साखळीतून साकारले भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली नोंद ·         वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ·         मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अनोखा उपक्रम ·           वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी आज वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी मतदान होत असून यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजवावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. य