Posts

Showing posts from 2026

विशेष वृत्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ३६ हजारांहून अधिक शेतकरी खाती पोर्टलवर अपलोड

Image
विशेष वृत्त  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ३६ हजारांहून अधिक शेतकरी खाती पोर्टलवर अपलोड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्याची गरुडझेप; ९९.९८ टक्के काम पूर्ण वाशिम, दि. २६ जून (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील शेतकरी कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जवळपास शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांची माहिती त्यांच्या स्तरावरून संगणकीय प्रणालीद्वारे सादर करण्यात येणार आहे. यासोबतच योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी विविध संस्था व कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्याचे कामही वेगाने सुरू आहे. ४२४ विकास संस्थांचा सहभाग जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (वाशिम) यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ४२४ विविध कार्यकारी विकास संस्थांमार्फत शेतकऱ्यांच्या क...

कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी!

Image
🌿 कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी! शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' चा मुख्य उद्देश आहे. समृद्ध शेतकरी म्हणजे समृद्ध महाराष्ट्र, हीच या योजनेमागील प्रेरणा आहे. #शेतकरीसक्षमीकरण #कृषीसमृद्धी #महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना!

Image
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना! सुमारे ५६ लाख शेतकरी लाभार्थी आणि अंदाजे ₹३६,५०० कोटींचा लाभ. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचे मोठे पाऊल. #महाकर्जमुक्ती #शेतकरीसक्षमीकरण #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन

कर्जमाफी नव्हे, आर्थिक सक्षमीकरण!

Image
📈 कर्जमाफी नव्हे, आर्थिक सक्षमीकरण! शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, नव्याने कर्जप्रवाह सुरू करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे हा योजनेचा मुख्य उद्देश. #आर्थिकसक्षमीकरण #कृषीअर्थव्यवस्था #महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कर्जमुक्ती योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यांचे नाव.

Image
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कर्जमुक्ती योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यांचे नाव.  राज्य शासनाने केले त्यांच्या कार्याला अभिवादन. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६  #महाराष्ट्रशासन

शेतकरी बंधूंनो, आजच आवश्यक माहिती अद्ययावत करा !

Image
🌾 शेतकरी बंधूंनो, आजच आवश्यक माहिती अद्ययावत करा ! 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ घेण्यासाठी खालील बाबी तात्काळ पूर्ण करा. ✅ आधार क्रमांक अद्ययावत करा ✅ बँक खाते व मोबाईल क्रमांक अद्ययावत करा ✅ जमिनीच्या नोंदी अद्ययावत करा ✅ मृत कर्जदार खातेदारांच्या वारसांची नोंद करून घ्या ✅ आधार नसल्यास नवीन आधार कार्ड काढा ✅ आधारशी मोबाईल क्रमांक लिंक करा 📱 अचूक व अद्ययावत माहितीमुळे योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल. समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र 🌱 #महाकर्जमुक्ती #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकल्याण #आधार #DigitalMaharashtra #कृषीविकास #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #FarmerFirst

महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल !

Image
महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल ! 🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे. ✅ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना ✅ लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा ✅ नव्या उत्साहाने शेती आणि विकासाला बळ समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र #महाकर्जमुक्ती #शेतकरीकल्याण #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्ती२०२६ #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #MaharashtraGov

ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे!

Image
🌟 ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे! राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून त्यांना नव्या आशा, नव्या संधी आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची ताकद देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतकरी सक्षम झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल आणि महाराष्ट्र अधिक समृद्ध बनेल. #महाकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #शेतकरीसन्मान #समृद्धमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जरक्कम ₹२ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त रक्कम भरून तेही कर्जमुक्तीचा लाभ घेऊ शकणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे. #OTS #शेतकरीकल्याण #कर्जमुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार.

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार. #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

विशेष लेख :  महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढउतार आणि वाढते कर्जबाजारीपण या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही लाखो शेतकरी कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. समाजकल्याण, लोकहित आणि न्यायप्रिय प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करत शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि निर्धारित कालावधीत न भरलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जांना या योजनेत समाविष...

आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..!

Image
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..! #आषाढीवारी  #वारी2026  #वारकरी  #महाराष्ट्रशासन  #PandharpurWari  #AshadhiEkadashi   #MahaDGIPR

राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी

Image
राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी! ₹३६,५८५ कोटींच्या कर्जमाफीद्वारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ऐतिहासिक निर्णय. #कर्जमाफी  #शेतकरी  #शेतकरीकर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६  #कर्जमाफी  #शेतकरी    #शेतकरीकल्याण  #MahaDGIPR

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये...

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये... #महाराष्ट्रशासन #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIPR

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ.

Image
'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ. १० जुलै, २०२६ अंतिम मुदत... #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार #NationalTeachersAwards

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय!

Image
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय!  #महाराष्ट्र #विकसितमहाराष्ट्र२०४७ #Maharashtra  #MahaDGIPR

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय बैठकीत मंथन

Image
 एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय बैठकीत मंथन  राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच विविध कारणांमुळे एकल जीवन जगणाऱ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र व सर्वसमावेशक एकल महिला धोरण तयार करत आहे. या धोरणात तळागाळातील महिलांच्या समस्या, अनुभव आणि अपेक्षांचा समावेश व्हावा या उद्देशाने वाशिम येथे जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेशीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नवीन योजनांची आवश्यकता, विद्यमान योजनांमधील सुधारणा तसेच धोरणात्मक बदल याबाबत उपस्थितांनी मौल्यवान सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, जिव्हाळा फाउंडेशनच्या अश्विनी अवताडे, क्षितिज फाउंडेशन, मंगरूळपीरचे अतुल राऊत, सामाजिक कार्यकर्त्या वनमाला पेंढारकर, शांतीनिकेतन महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा वैशाली आरू, अपर्णा सेवाभावी संस्थेच्या अपर्णा जायभाये, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेश पायघन, माविमच्या कार्...

मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी 📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश;

Image
🗳️ मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी  📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश;  वाशिम, कारंजा व रिसोड येथे एसआयआर कामकाजाची पाहणी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाशिम, कारंजा आणि रिसोड येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी इन्युमरेशन फॉर्म (गणना प्रपत्र) डाउनलोड, छपाई, वितरण, संकलन तसेच मतदार नोंदींच्या पडताळणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधून गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 📍 जिल्ह्यातील १० लाख २० हजार २०८ मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी 📍 १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी देणार भेट 📍 दुबार नावे कमी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची अचूक नोंदणी हे मोहिमेचे प्र...

वादातून संवादाकडे... कारंजा तालुक्यात ४४ शेतपांदन रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास! 🌾🚜

Image
🚜🌾 वादातून संवादाकडे... कारंजा तालुक्यात ४४ शेतपांदन रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास! 🌾🚜 शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला की विकासाचा मार्गही आपोआप खुला होतो. कारंजा तालुक्यात महसूल प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून वाद, अडथळे आणि तक्रारींमध्ये अडकलेले शेतपांदन रस्ते पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत आले आहेत. महिनाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत एकूण ४४ रस्ते वहिवाटीस उपलब्ध करून देण्यात आले, ही कारंजा तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. 👨‍🌾 प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. 🤝 आपसी सामंजस्यातून अनेक वर्षांचे वाद मिटविण्यात आले. 🛣️ ३४ शेतरस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले. ⚖️ मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अंतर्गत १० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 📏 मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेअंतर्गत मंजूर १७ रस्त्यांची मोजणी पूर्ण करून त्यावरील अडथळे हटविण्यात आले. या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारला. काही ठिकाणी स्वतःहून रस्ते मोकळे करून देणाऱ्या शेतकऱ्य...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
🎓 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शासकीय आदिवासी वसतीगृह प्रवेश आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 📌 प्री-मॅट्रिक, कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 💻 अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : http://swayam.mahaonline.gov.in ⚠️ लक्षात ठेवा : ✅ स्वयंम योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. ✅ प्रथम वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ✅ वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच स्वयंम योजनेचा लाभ दिला जाईल. ✅ वसतीगृहात निवड झाल्यानंतर प्रवेश न घेतल्यास स्वयंम योजनेचाही लाभ मिळणार नाही. 📄 अर्ज करताना आधार कार्ड, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), प्रवेश पावती, बोनाफाईड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. 📢 अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून शासनाच्या या शैक्ष...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६  #कर्जमुक्ती  #शेतकरी   #MahaDGIPR

३० जून २०२६ ही अंतिम मुदत !आपल्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांच्या प्रकाशकांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
📰 ३० जून २०२६ ही अंतिम मुदत! आपल्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांच्या प्रकाशकांसाठी महत्त्वाची सूचना! प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Audited Annual Statement) प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेनुसार, अद्याप विवरणपत्र सादर न केलेल्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. ⚠️ वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास दंडाची तरतूद प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४(१)(ब) व १४(३) नुसार, ▪️ पहिल्या चुकीसाठी किमान ₹१०,००० दंड ▪️ त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी मागील दंडाच्या दुप्पट दंड ▪️ एकूण दंडाची कमाल मर्यादा ₹२ लाख म्हणून सर्व संबंधित प्रकाशकांनी कोणताही दंड टाळण्यासाठी आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यासाठी आपले लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र तात्काळ प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करावे. #PressRegi...

अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी घरपोच आहारात ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’चा समावेश होणार...

Image
अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी घरपोच आहारात ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’चा समावेश होणार... #अंगणवाडी #गरोदरमाता #कुपोषणमुक्तभारत #पौष्टिकआहार #NutritionForAll #PoshanAbhiyaan #Anganwadi #MaternalHealth #ChildNutrition

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY)' अंतर्गत ७४१ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम!

Image
'प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY)' अंतर्गत ७४१ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम! २३ ते २५ जून २०२६ दरम्यान ग्रामसभेत सहभागी व्हा आणि आपल्या गावाला ‘आदर्श ग्राम’ बनविण्याच्या प्रवासात योगदान द्या. #प्रधानमंत्रीआदर्शग्राम #ग्रामसभा #आदर्शग्राम #लोकसहभाग #PMAJAY #AdarshGram #GramSabha

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

Image
🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थकीत पीक कर्जातून मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आणि अॅग्रीस्टॅक आयडीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 📌 योजनेतील प्रमुख लाभ : ✅ १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेले पीक कर्ज पात्र ठरणार. ✅ ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाच्या थकबाकीवर मुद्दल व व्याजासह कमाल २ लाख रुपयांपर्यंत लाभ. ✅ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ. ✅ सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ. 📋 शेतकऱ्यांनी काय करावे? 🔹 आधार क्रमांक आणि अॅग्रीस्टॅक आयडीची माहिती संबंधित...

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल!महाराष्ट्र शासन तयार करीत आहे स्वतंत्र "एकल महिला धोरण"📢 सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

Image
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल! महाराष्ट्र शासन तयार करीत आहे स्वतंत्र "एकल महिला धोरण" 📢 सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन समाजातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र "एकल महिला धोरण" तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. महिलांच्या जीवनातील विविध अडचणी, आव्हाने आणि गरजा लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा या धोरणात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ समस्या मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणते ठोस निर्णय घ्यावेत, कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत तसेच आवश्यक असल्यास कायदे व नियमांमध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवा...

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी एस आय आर ऐतिहासिक पाऊल!

Image
🗳️ मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल! 📢 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियान सुरू केले असून वाशिम जिल्ह्यातील तब्बल १० लाख २० हजार २०८ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, नवीन नोंदणी आणि मतदार नावे वगळण्याच्या प्रक्रिया झाल्याने काही ठिकाणी दुबार नोंदी, मृत मतदारांची नावे किंवा अपूर्ण माहिती राहिल्याची शक्यता आहे. या सर्व बाबींची शहानिशा करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत योग्यरित्या समाविष्ट राहावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 📌 महत्त्वाचे टप्पे 🔹 २० ते २९ जून २०२६ : गणना अर्जांची छपाई व प्रशिक्षण ...

मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत सर्वांनी पुढाकार घ्यावा !

Image
🗳️ मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा ! लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेली मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आणि मतदार यादीतील नोंदी अचूक राहणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी रवी काळे, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव तसेच जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खं...

माहिती अधिकारासाठी नवे नियम लागू !महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी

Image
📢 माहिती अधिकारासाठी नवे नियम लागू ! महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी माहितीचा अधिकार (आरटीआय) अधिक प्रभावी, पारदर्शक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने "महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६" जाहीर केले आहेत. हे नवे नियम राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून ते तत्काळ लागू झाले आहेत. 🔹 अर्जासाठी नवे नियम ▪️ संबंधित राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे साध्या कागदावर अर्ज करता येईल. ▪️ अर्ज शुल्क ३० रुपये निश्चित. ▪️ अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा. ▪️ अर्जाची शब्दमर्यादा साधारणतः १५० शब्द. 🔹 माहिती मिळविण्यासाठी शुल्क ▪️ ए-४ आकाराच्या प्रत्येक पानासाठी ५ रुपये. ▪️ स्कॅन किंवा डिजिटल प्रतींसाठी प्रति पान ५ रुपये. ▪️ अभिलेख पाहणीसाठी पहिला तास विनामूल्य. ▪️ त्यानंतर प्रत्येक तासासाठी ५० रुपये शुल्क. 🔹 ऑनलाइन सुविधांचा विस्तार ▪️ यूपीआयसह विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून शुल्क भरण्याची सुविधा. ▪️ डिजिटल प्रक्रियेला अधिक प्रोत्साहन. 🔹 ओळखपत्र जोडणे बंधनकारक ▪️ अर्जासोबत छायाचित्रयुक्त ओळखपत्राची स्वयंप्रमाणित प्रत जोडावी लागणार. ▪️ ओळखपत्र नसल्यास अर्ज परत पाठ...

देशातील प्रत्येक कार्यस्थळ महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Image
📍 नवी दिल्ली देशातील प्रत्येक कार्यस्थळ महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा-२०१३ देशात प्रभावीपणे राबविण्यासाठी १८ महत्त्वाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या निर्देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत जबाबदारी निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. महिलांना सन्मान आणि उपजीविका यामध्ये निवड करण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचे केंद्र बनले पाहिजे असे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/204385/  #पॉशकायदा #राष्ट्रीयमहिलाआयोग

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना शासकीय पडीक जमिनी केवळ १ रुपये दराने भाडेपट्ट्याने मिळणार!

Image
राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना  शासकीय पडीक जमिनी केवळ १ रुपये दराने भाडेपट्ट्याने मिळणार! ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनी महिला बचत गट, ग्रामसंघ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या गटांना केवळ १ रुपया नाममात्र दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. यामध्ये जनावरांच्या चारा लागवडीसाठी ३ वर्षे तर बांबू लागवडीसाठी १० वर्षांच्या कालावधीकरिता जमीन उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेत १० महिला सदस्य असलेल्या बचत गटांना १ हेक्टर, २० सदस्य असलेल्या संस्थांना २ हेक्टर, तर ग्रामसंघाला ५ हेक्टरपर्यंत जमीन मिळू शकते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या जमिनींची निश्चिती केली जाणार असून, यामुळे महिलांना रोजगाराच्या शाश्वत संधी मिळण्यासोबतच शासकीय जमिनींचे अतिक्रमणापासून संरक्षणही होणार आहे. #RevenueDepartment #MaharashtraGovernment #RajmataJijauMahilaSaksham...

नियमित योगाभ्यासातून निरोगी व संतुलित जीवनशैली घडतेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रतिपादन

Image
🧘‍♂️ नियमित योगाभ्यासातून निरोगी व संतुलित जीवनशैली घडते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रतिपादन 🌿 १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न 🌿 वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होत असल्याचे सांगितले. निरोगी व संतुलित जीवनासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमास तहसीलदार पळसकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, प्राचार्य संजय शिंदे, प्रा. अनिल बोंडे, तालुका क्रीडा अधिकारी मंगला शेंडे, योग मार्गदर्शक कुलदीप बदर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 🧘 योगाचार्य कुलदीप बदर...

A new era of healthcare begins in Maharashtra!

Image
A new era of healthcare begins in Maharashtra! Navi Mumbai International MediCity (NMIMC) will bring together world-class healthcare, medical education, research, innovation, and medical tourism on a single integrated platform. With a USD 1.2 billion investment, over 10,000 direct jobs, and Cleveland Clinic as the anchor institution, Maharashtra is taking a major step towards becoming a global healthcare destination aligned with the ‘Heal in India’ vision. #NaviMumbaiMediCity #NMIMC #HealInIndia #HealthcareInnovation #MedicalTourism #HealthcareHub #Brookfield #ViksitMaharashtra #FutureOfHealthcare #HealthcareEcosystem

मिशन वात्सल्य योजनासुरक्षित बालपण... उज्ज्वल भविष्य!

Image
मिशन वात्सल्य योजना सुरक्षित बालपण... उज्ज्वल भविष्य! #मिशनवात्सल्ययोजना #बालसंरक्षण  #बालकल्याण  #महिलावबालविकासविभाग #MissionVatsalya #ChildWelfare  #ChildProtection  #WomenAndChildDevelopment  #MahilaBalVikasVibhag

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भयमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. ‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक कार्यस्थळ अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनवूया.

Image
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भयमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. ‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक कार्यस्थळ अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनवूया. #POSHकायदा #महिलासुरक्षा #सुरक्षितकार्यस्थळ #महिलासन्मान #कामगारविभाग #Maharashtra #WomenSafety #POSHAct2013 #SafeWorkplace #GenderEquality #महिलाशक्ती

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार • एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विका...

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल!

Image
📌 नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! #नवीमुंबईइंटरनॅशनलमेडिसिटी #उद्योग #गुंतवणूक #रोजगार  #आरोग्य #NaviMumbaiInternationalMedicity  #HealthcareInnovation  #InvestmentInMaharashtra  #EmploymentGeneration #HealthcareEcosystem #ViksitMaharashtra  #PublicHealth

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे.

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. . . In 4,399 days, PM Modi's vision accelerated India's clean energy journey. #LongestServingElectedPMModi

वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

Image
सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व प्रगतीमुळे देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला असून, कार्बन उत्सर्जनात घट, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. From 21,801 km of electrified railway tracks in 2014 to 69,873+ km in 2026, India’s rail network has witnessed a remarkable transformation. This rapid expansion is enhancing connectivity, reducing carbon emissions, improving operational efficiency. #LongestServingElectedPMModi

जिल्ह्यात मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान राबविण्यात येणार ..किडनी विकारांविरुद्धची आरोग्यदायी चळवळ...वेळेवर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीद्वारे नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाचा संकल्प

Image
विशेष वृत्त जिल्ह्यात मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान राबविण्यात येणार  किडनी विकारांविरुद्धची आरोग्यदायी चळवळ वेळेवर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीद्वारे नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाचा संकल्प वाशिम,दि.९ जुन (जिमाका) आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असताना किडनीच्या दीर्घकालीन आजारांचे (CKD) संकटही गंभीर होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नसल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये विकार उशिरा निदर्शनास येतो आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुंबई कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान’ हे जनसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात किडनीच्या दीर्घकालीन आजारांच्या तपासणीचे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांची किडनीविषयक तपासणी, जोखीम असलेल्य...

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा 💧

Image
💧 जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा 💧 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जल व स्वच्छता मिशनची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत जल जीवन मिशन, नळपाणी पुरवठा योजना तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ✅ जिल्ह्यातील सुमारे ७४० पाणीपुरवठा योजनांपैकी ४४० योजना पूर्ण ✅ सुमारे २.०२ लाख घरांना कार्यक्षम घरगुती नळजोडणी उपलब्ध ✅ जिल्ह्याची जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती सुमारे ९२ टक्के ✅ हर घर जल उपक्रमांतर्गत सुमारे १५० गावे घोषित ✅ सामुदायिक स्वच्छता संकुलांची सुमारे ३०० कामे पूर्ण ✅ सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची प्रगती सुमारे ८४ टक्के बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमित स्थळभेटी घेऊन कामांची गुणवत्ता तपासण्याचे, प्रगतीचा सातत्याने आढावा घेण्याचे तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. "प्रत्येक योजना वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी सर्व विभागांन...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझी वसुंधरा’ शपथ 🌱

Image
🌍 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ 🌱 जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प दिला. 🌳 किमान पाच वृक्षांची लागवड व संगोपन 💧 पाणी संवर्धन ⚡ विजेचा काटकसरीने वापर 🚲 पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब 🌿 सेंद्रिय खतांचा वापर व परसबाग विकास हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे. "हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी आजच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करूया!" 🌎💚 #WorldEnvironmentDay #MajhiVasundhara #EnvironmentProtection #GreenFuture #Washim #माझीवसुंधरा #जागतिकपर्यावरणदिन

जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लिग स्पर्धा अभियानात उत्स्फूर्त सहभाग 🌾

Image
🌾 जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लिग स्पर्धा अभियानात उत्स्फूर्त सहभाग 🌾 कृषी विभाग व आत्मा, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या फार्मर ग्रुप लिग (एफजीएल) २०२६ या अभिनव स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७६८ शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला आहे. 📌 तालुकानिहाय सहभाग : 🔹 रिसोड – १४८ 🔹 वाशिम – १३५ 🔹 मानोरा – १३१ 🔹 कारंजा – १२८ 🔹 मालेगाव – ११५ 🔹 मंगरुळपीर – १११ या स्पर्धेद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, नैसर्गिक शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जलसंधारण, पीक संरक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार केला जाणार आहे. तसेच "खेती बचाओ अभियान" प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांमध्ये सामूहिक कृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याला चालना दिली जाणार आहे. 🌱 संघटित शेतकरी, समृद्ध शेती आणि शाश्वत विकास हेच या अभियानाचे प्रमुख ध्येय आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. #Farmer...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

Image
🏫 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू 📚 इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी तसेच पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 📍 स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा : 🍛 मोफत भोजन व निवास व्यवस्था 📖 सुसज्ज ग्रंथालय 📝 स्वतंत्र वाचन कक्ष 💪 आधुनिक जिम 🎯 स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन 🌳 स्वच्छ व निसर्गरम्य परिसर आरक्षणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 💻 ऑनलाइन अर्जासाठी : https://hmas.mahait.org 📞 अधिक माहितीसाठी : पी. आर. गिरी मो. ८७८८२९५६६८ उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. #HostelAdmission2026 #DrBabasahebAmbedkarHostel #SocialJusticeDepartment #StudentWelfare #Washim...

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द

Image
📢 महत्त्वाची सूचना आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या वार्षिक निवडणूक-२०२६ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जून २०२६ महिन्यात आयोजित करण्यात येणारा विभागीय लोकशाही दिन तसेच महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने दिनांक १८ मे २०२६ पासून संबंधित निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. शासनाच्या नियमानुसार आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात संबंधित स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. #महत्त्वाची_सूचना #लोकशाहीदिन #महिलालोकशाहीदिन #आदर्शआचारसंहिता #Election2026 #Washim

दर्जेदार दूरसंचार सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Image
📡 दर्जेदार दूरसंचार सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दूरसंचार समिती (DLTC) बैठकीत जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क, भारतनेट, बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन, ५जी सेवा, राईट ऑफ वे (RoW), CBuD प्रणाली आणि संचार साथी उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. 🔹 जिल्ह्यातील ७८० गावे मोबाईल नेटवर्कद्वारे कव्हर 🔹 २,१३४ बिटीएस व ५८० मोबाईल टॉवर्स कार्यरत 🔹 बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन प्रकल्प पूर्ण 🔹 CBuD प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश नागरिकांनी 'संचार साथी' अॅप व संकेतस्थळाचा वापर करून दूरसंचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. #DLTC #Washim #TelecomServices #CBuD #SancharSaathi #DigitalIndia #JansamparkWashim