खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे
खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व वेळेत काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खरीप हंगाम, जल जीवन मिशन तसेच विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन सुविधा व कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी, तसेच पीक नियोजनाबाबत प्रभावी मार्गदर्शन देण्यात यावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये आणि खरीप हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचाही आढावा घेऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकर व्यवस्था, जलस्रोत पुनर्भरण, विहिरी व बोअरवेल...