शासकीय योजनांच्या जत्रेतून लाभार्थ्यांनाय ोजनांचा लाभ देण्याचे नियोजन करावे षण्मुगराजन एस.पुर्वतयारी आढावा सभा
- Get link
- X
- Other Apps
शासकीय योजनांच्या जत्रेतून लाभार्थ्यांना
योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करावे
पुर्वतयारी आढावा सभा
वाशिम, दि. 11 (जिमाका) : एप्रिल किंवा मे महिन्यात जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या जत्रेतून जिल्हयातील शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासकीय योजनांच्या जत्रेच्या पुर्वतयारीचा आढावा आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, विविध यंत्रणांनी त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही, त्या लाभार्थ्यांपर्यंत संबंधित यंत्रणांनी पोहोचावे. संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यायासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पुर्तता लाभार्थ्यांकडून करुन घ्यावी. लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी जो अर्ज करुन घ्यायचा आहे, तो अर्ज पुर्णपणे संबंधित यंत्रणेने भरुन घ्यावा. त्याला लागणारी सर्व कागदपत्रे सोबत जोडलेली आहे याबाबतची संबंधित विभागाने खात्री करावी. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा. लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची विविध यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा हया लाभार्थ्यांना वेळेत उपलब्ध होतील यादृष्टिने नियोजन करावे. ज्या विभागाच्या सेवा ऑनलाईन नाहीत त्यांनी तातडीने हया सेवा ऑनलाईन करण्याच्यादृष्टिने कार्यवाही करावी. ज्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या नाही त्याची कारणे त्वरीत सादर करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यंत्रणांनी पार पाडावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, ज्या लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज येईल त्या अर्जावर गांभिर्याने विचार करुन संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळून दयावा. लाभार्थ्यांला वेळेत लाभ दिला जाईल या कामात दिरंगाई होणार नाही याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. यंत्रणांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजपासूनच क्षेत्रीयस्तरावर शासकीय योजनांच्या जत्रेसाठी कामी लावावे. प्रत्येक गावातून 100 पेक्षा जास्त, तालुक्यात 15 हजार लाभार्थ्यांना तर जिल्हयात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करावे असे सांगितले. यावेळी श्री. हिंगे यांनी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाची माहिती दिली.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment