सबळीकरण व स्वाभीमान योजना व उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा उत्साहात



सबळीकरण व स्वाभीमान योजना व

उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा उत्साहात

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आज 12 एप्रिल रोजी डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणजिल्हा समाज कल्याण अधिकारीजिआणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित करण्यात आलीया कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉशशीकांत कानफाडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जीबीगिरी, माविमचे तालुका व्यवस्थापक संतोष मुखमालेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. खांडेकर व समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.

            मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविकातून हरीष वानखेडे  यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना व अनुसूचित जाती उपयोजना लाभार्थ्यांच्या कार्यशाळेची रुपरेषा सांगून योजनेबाबत माहिती दिलीश्रीखांडेकर यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती दिलीतसेच महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलविषयी माहिती सांगितलीश्रीमुखमाले यांनी जिल्ह्यामध्ये महिला हया बचतगटाच्या माध्यमातून प्रगती करीत आहे. महिला बचतगटांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            श्रीगिरी यांनी फायदेशीर शेतीसाठी पाण्याची उपलब्धतामाती नमुना तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे सांगितले. डॉबाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुजातीजमाती घटकांतील लाभार्थ्यांनी विहीरशेततळे इत्यादींसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           डॉकानफाडे यांनी तळागाळातील वंचित घटकांपर्यंत योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याचे आवाहन केलेत्यासाठी गावातील आशासेविकाअंगणवाडी सेविकातलाठी व ग्रामसेवक या गावपातळीवर कार्य करणाऱ्यांची मदत घेतली पाहिजे असे सांगितलेदुधाळ म्हशी वाटपशेळी गट वाटप अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिलीआनंदा ताकतोडे या लाभार्थ्याने मनोगतातून आपल्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतून मिळालेल्या शेतीमुळे प्रगती झाली असल्याचे सांगून जमीन नावावर झाल्याचा आनंद व्यक्त केला.

            श्रीगव्हाळे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुजाती घटकातील भूमीहीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर 2 एकर बागायती किंवा 4 एकर जिरायती जमीन देण्यात येते. यावेळी त्यांनी अनुसूचित जाती उपयोजनेची सर्व तपशीलवार माहिती सांगून विविध योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभामुळे अनुसूचित जाती व जमाती घटकातील लाभार्थ्यांची प्रगती झाल्याचे सांगितले.

            अध्यक्षीय भाषणातून श्रीतोटावार यांनी सामाजिक न्याय पर्वानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करुन गावपातळीवर सर्व योजनांचे चिंतन करणे आवश्यक असल्याचे सांगितलेतरुणांनी रोजगारांसाठी गट स्थापन करणे आवश्यक आहेतसेच कृषी विभागामार्फत 135 योजना राबविण्यात येत असल्याचे श्री. तोटावार यांनी सांगितले.    

             सुत्रसंचालन प्रागजानन हिवसे यांनी केले तर आभार समतादूत प्रणिता दसरे यांनी मानलेकार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीयोजनेचे लाभार्थी व नागरीकसामाजिक न्याय विभागातील अधिकारी  कर्मचारीशासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी तसेच शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सर्व ब्रिक्स प्रालि क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                                                                *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश