जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ 

वाशिम दि.२६(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, तांत्रिक कृषी अधिकारी एस.एस.मकासरे व कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती
      आजपासून 30 जुलैपर्यंत तीन चित्ररथ जिल्ह्यातील काही गावात जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करणार आहे. या चित्ररथावर पीक विमा योजनेची माहिती लावण्यात आली आहे. ऑडिओ जिंगल्स,योजनेचे पॉम्लेट्स आणि भित्तीपत्रकाच्या माध्यमातून माहिती गावपातळीवर शेतक-यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.चित्ररथामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी 31 जुलैपर्यंत पिक विमा काढण्यास प्रोत्साहित होतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे