भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 31 मार्चपर्यंत अर्ज मागविले

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

31 मार्चपर्यंत अर्ज मागविले

           वाशिम, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासुन सुरू केली आहे. सन 2017-18, 2018-19 व 2019-20 मधील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2021-22 मध्ये अर्जाचे नुतनीकरणासाठी मागील सत्रा परिक्षांची गुणपत्रिका व महाविद्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या वषानुसार स्वतंत्रपणे भाडे करारनामा व अर्जामध्ये नमुद इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

               पात्रतेसाठीसंबंधी निकष पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करताना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व वसतीगृहात प्रवेश अर्ज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. जिल्हयाच्या नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशित असावा. विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा. वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीपासून किमान 5 कि.मी. पेक्षा कमी अंतरावरील परिसरातील रहिवासी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रम किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. इयत्ता 11 वी, 12 वी आणी त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका व्यावसायिक/बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला प्रवेशीत असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्षे असावा. दिव्यांगासाठी (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के इतकी राहील.

            विद्यार्थ्यांनी प्रवेशित महाविद्यालयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज 31 मार्च 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे