पीएम किसान योजना : प्रलंबीत ई-केवायसी व आधार सिडींग6 सप्टेंबरपर्यंत पुर्ण कराकृषी विभागाचे आवाहन
- Get link
- Other Apps
पीएम किसान योजना : प्रलंबीत ई-केवायसी व आधार सिडींग
6 सप्टेंबरपर्यंत पुर्ण करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 04 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान योजनेची सन २०१९-२० पासुन अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बॅंक खाते आधार संलग्न करणे व भुमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्यात आहे. तरी शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पुर्ण करणार नाही किंवा बॅंक खाती आधार संलग्न करणार नाहीत, त्यांची नावे या योजनेतुन वगळण्यात येणार आहे.
ई- केवायसी करण्याकरीता माहे मे, जुलै व ऑगष्ट महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली आहे. परंतु अद्यापही जिल्हयातील 14 हजार 829 लाभार्थ्यांची ई - केवायसी प्रलंबित दिसुन येत आहे. तसेच 11 हजार 117 लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबीत आहे. संपर्क करुनही ई- केवायसी व आधार सिडींग करण्याकरीता प्रतिसाद देत नसलेल्या व लाभार्थ्याचे नाव वगळण्यासाठी शासनस्तरावरुन सुचना प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी व बॅंक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-केवायसी व बॅंक खाते आधार संलग्नीसकरण करण्यात यावे. न केल्यास ७ सप्टेंबर २०२३ पासून नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.
*******
- Get link
- Other Apps
Comments
Post a Comment