भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे

भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे

वाशिम, दि.२२ (जिमाका) अनुसूचित जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅटीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी,परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अर्ज स्विकारण्यासाठी  १४ डिसेंबर २०२१ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.  
           सन २०२१-२२ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्याथ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे https://mahadbtimahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. तसेच महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी असल्याबाबत महाविद्यालय स्तरावरून अवगत करावे.तसेच महाविद्यालयानी जास्त प्रमाणात नोदणीकृत होतील याकडे लक्ष द्यावे. सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती सन २०२१-२२ करीता अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर अर्ज परत पाठविण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२२ असून याबाबत कार्यवाही करुन पात्र अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण वाशिम यांचे लॉगीनला पाठविण्यात यावे. तरी जिल्हयातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवावे.     
                 जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यानी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करून तसेच महाडीबीटी पोर्टल hiups:/dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी (फ्रिशीप) योजना व इतर ऑनलाइन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी.असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.
******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे