‘राष्ट्रीय पोषण महिना’ विशेष लेख क्र. 1 : - आहारात हवीत पोषणमुल्ये..

राष्ट्रीय पोषण महिना’ विशेष लेख क्र. 1 : -

आहारात हवीत पोषणमुल्ये..
दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहिम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्व सांगणारा हा लेख ...
अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणेझीज भरुन काढणेउर्जा निर्मितीकार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिनेपाणीजीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एका प्रौढ व्यक्तीला साधारणत: 3000 उष्मांक लागतात. त्याच्या आहारात 90 ग्रॅम प्रथिने90 ग्रॅम स्निग्ध द्रव्य व 450 ग्रॅम पिष्टमय पदार्थ (1:1:5) हे प्रमाण असावे. त्यात एकदल 400 ग्रॅम धान्य85 ग्रॅम द्विदल धान्यपालेभाज्या 115 ग्रॅमइतर भाज्या 85 ग्रॅमकंदभाज्या 85 ग्रॅमफळे 85 ग्रॅमदुध – दही 285 ग्रॅममांसाहार 125 ग्रॅमसाखर / गुळ 60 ग्रॅमतेल-तूप 60 ग्रॅम अशा अन्नाचा समावेश केला तर पुरेशी जीवनसत्वे व खनिजे उपलब्ध होतात.
पण सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या जेवणांत कार्बोदकांचे प्रमाण जास्त असून इतर घटक त्या मानाने कमी पडतात. साधारणपणे घरात 4 माणसे असली की एक पाव किंवा अर्धा किलोग्रॅम पालेभाजी आणली जाते. पण मग ती शिजून अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी होते. घरातील 4 माणसांनी खाऊन उरली की ती उरलेली भाजी शिळी झाली म्हणून टाकून दिली जाते. पण एका प्रौढ व्यक्तीने अंदाजे 125 ग्रॅम पालेभाजी खावी तर त्यातले पौष्टिक घटक मिळू शकतातपण आपण मात्र शिजून 1 पाव झालेली भाजी 4 लोक वाटून खातो. मग आवश्यक तेवढे पोषण घटक कसे मिळतीलत्याशिवाय कंदभाजीदुधतूपमांसाहार या बाबीचा समावेशसुध्दा आपल्या रोजच्या आहारात व्हायला हवा.
आहारातील पोषणमुल्यांची कमतरता आणि आरोग्य :-
आहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे. बरेचसे आजारव्याधीविकृती याचे मूळ कारण अयोग्य आहार हेच आहे. लहान मुलांच्या शारिरीक आणि बौध्दिक वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. प्रथिनांच्या अभावाने मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. क्रॉशियाक्रॉर आजारात अंगावर सूज येते. केस लालसर सोनेरी दिसतात व कमजोर होऊन तुटतातत्वचा कोरडी व शुष्क पडतेडायरिया होतो. रक्तक्षय होतोरोगप्रतिकारशक्ती कमी होते. उष्मांकांच्या कमतरतेने मॅरॅामस होतो. त्यात वजन कमी होऊन हातापायाच्या काड्या होतात. मुल चिडचिडे होते.
गरोदरपणात प्रथिने कमी पडली तर वारंवार गर्भपात होतो. अपूर्ण दिवसांचे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकतेमृत मूल जन्माला येऊ शकते. विपरीत परिणामांबरोबर रक्तक्षय यामुळे गर्भाच्या मेंदूची वाढ बरोबर होत नाही. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रोटीन्सच्या कमतरतेने वजन कमी होणेअंगावर सूज येणेपोटात पाणी होणे असे दुष्परिणाम दिसू श्कतात.
स्निग्ध पदार्थांच्या अभावाने त्वचा कोरडी होतेवजन कमी होतेमेंदूचा ऱ्हास होतो. जीवनसत्त्वांच्या अभावाने शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. अ व्हिटामीनच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा,डोळ्याच्या पांढऱ्या भागात तिळासारखा डाग दिसणेदृष्टी गामवणेरोग प्रतिकारशक्ती कमी होते. ड व्हिटामीनच्या कमतरतेने मूडदूस होतो. कॅल्शियम आणि फॉस्फोरसच्या कमतरतेने हाडे ठिसूळ होतात. हाडांच्या विविध समस्या उद्भवतात. ब व्हिटामीनच्या कमतरतेने बेरीबेरी आजार होतोत्यात मेंदूकार्यात दोष निर्माण होतोस्मरणशक्ती कमी होतेभूक लागत नाहीपचन नीट होत नाही. ब व्हिटामीनच्या कमतरतेने वरचेवर तोंड येतेजीभ लाल होतेअन्नपचन नीट होत नाहीत्वचेचे विकार होतात. ब 6 व्हिटामीनच्या कमतरतेने pellagra नावाचा  आजार होतो. त्वचा शुष्क होतेमानसिक बदल होतो. क व्हिटामीनच्या कमतरतेने स्कर्व्ही नावाचा आजार होतोत्यात हिरड्यांमधून रक्त येणेसांध्यांना सूज येणे असा त्रास होतो. लोहाच्या कमतरतेने रक्तक्षय होतो. एकाग्रता कमी होतेधाप लागते. आयोडिनच्या कमतरतेने गलगंड होऊ शकतो.
आहाराचे नियोजन :-
पदार्थांचा रंगपोतचवआकार यालाही महत्त्व आहे. एकाच जेवणात या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांचे आयोजन करताना त्यांचे रंगही लक्षात घ्यावे. जसे पांढरा भातपिवळे वरणहिरवी पालेभाजीपिवळसर फळभाजीरंगीत कोशिंबीरपिवळी कढी इत्यादी. पातळघट्टमऊ कुरकुरीत असे पदार्थ आहारात असावेत. पातळ वरणघट्ट फळभाजी,मऊ भातपोळीभाकरीकुरकुरीत पापड इत्यादी.
अन्न शिजविण्याच्या विविध पध्दतींचा वापर करावा. जसे भाजलेली पोळीतळलेली पुरीउकळलेला भातवाफवलेली इडली. आंबटगोडतिखट अशा चवीचे पदार्थ एकाच जेवणात असावे. ताटातील संपूर्ण पदार्थापैकी काही सौम्यमध्यम व काही तीव्र चवीचे असावे. म्हणजे सौम्य मसाले भातमध्यम भाजी आणि तीव्र चटणी.
विविध अन्नपदार्थ शिजविण्याच्या पध्दतीचा वापर करत असताना खाद्य पदार्थांतील पोषक तत्त्वांचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळे यांची उपलब्धता विशेष असते. त्यामुळे ज्या ऋतूत ज्या भाज्या आणि जी फळे मिळतील त्यांचा आहारात उपयोग करावा. संपूर्ण दिवसातील आहारामध्ये विविधता असावी. सकाळची न्याहरीदुपारचे जेवणसायंकाळची न्याहरी आणि रात्रीच्या जेवणाचा विचार होणे आवश्यक आहे.
तीव्र मसालेयुक्त पदार्थ टाळावेतकारण ते पचनेंद्रियांना बाधक ठरतात. घरात वृध्द माणसे व लहान मुले असतील त्यांचा विचार करुन आहाराचे नियोजन करावे. रोजच्या आहारातून कमी खर्चात जास्तीत जास्त पोषकमुल्ये मिळविणे शक्य आहे. आहार तोचपण ज्ञान आणि कौशल्याचा वापर केला तर आपण योग्य पोषण मिळवू शकतो.
काही दक्षता
तांदूळडाळ जास्त वेळा धुऊ नये. कारण त्यातील पौष्टिक घटक वाहून जातात. शिजताना भाताचे पाणी काढून फेकू नये. बरेच लोक पुलावबिर्यानी मोकळी होण्यासाठी तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून ते पाणी फेकून देतातपण त्यामुळे पौष्टिक मुल्यांचा ऱ्हास होतो. भाजी कापण्याआधी धुऊन निथळून घ्यावी. कापून धुतली असता अन्नसत्त्वे पाण्याबरोबर नाश पावतात. दोन्ही वेळच्या जेवणात एक वाटीभर वरण असावे. वरण किंवा आमटी करतांना एक डाळ वापरण्याऐवजी दोनतीन डाळी मिसळून करावी. रोजच्या आहारात वेगवेगळया प्रकाराच्या भाकरी घ्याव्यात. कधी ज्वारीकधी बाजरी कधी नाचणीची भाकरी बनवावी.

-     डॉ. स्वाती घोडमारे,
      प्रभारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी,
      पोषाहार विभागनागपूर

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे