भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा देशवासियांना अभिमान - शैलेश हिंगे
· जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शौर्यदिन’ साजरा · जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजन वाशिम , दि . २९ : भारतीय सैनिकांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्याच्या या व अशा पराक्रमांचा देशवासियांना अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘शौर्यदिन’ कार्यक्रमात केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, माजी सैनिक संजय देशपांडे आदी उपस्थित होते. शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री. हिंगे म्हणाले की, भारतीय सैनिकांनी चीन, पाकिस्तान विरुध्द झालेल्या युद्धांमध्ये अतुलनीय कामगिरी करून देशाचे नेहमीच संरक्षण केले आहे. दोन वर्षांपूर्वी सीमेपार प...