राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने - सुधीर मुनगंटीवार







मुंबई, दि. 12 :  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८  वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवनचंपकवनकदंबवनअशोकवनआम्रवनजंबुवनवंशवनमदनवृक्ष वनचरक वनलता वनसारिका वन मगृसंचार वनअतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवनेप्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत.
वन उद्याने
माजीवाडाकानविंदे(ठाणे)कार्लेखिंडचौल(रायगड)तेनपापडखिंड (पालघर)खाणूचिखली (रत्नागिरी)रानभाबूलीमुळदे (सिंधुदूर्ग)नऱ्हेरामलिंग (पुणे)गुरेघरपारगाव (सातारा)बोलवाडखामबेले (सांगली) कुंभारीमळोली (सोलापूर)कागलपेठ वडगाव (कोल्हापूर)पठारी (औरंगाबाद)माणकेश्वरगंगाखेड (परभणी)बोंदरवदेपुरी (नांदेड)तीर्थढोकी (उस्मानाबाद)जालना ट्रेनिंग सेंटरदहीपुरी(जालना)एसआरपीएफपोतरा (हिंगोली)नारायणगडसेलुम्बा (बीड)तांबरवाडीनागझरी (लातूर)कुडवानवाटोलामोरगावगराडा(गोंदिया)वर्धा एमआयडीसीरांजणी (वर्धा)वेण्णा (नागपूर)डोंगराला (भंडारा)चंद्रपूरगोंदेडागोंडपिंपरी (चंद्रपूर)धानोरा (गडचिरोली)पारेगावमाणिकपुंजकांदाने (नाशिक)जामखेळ (धुळे)कुंभारखोरीबिलाखेड(जळगाव)नांदुरखीआठवाड (अहमदनगर)कोथाडाहोल (नंदूरबार)उपटखेडामदलाबाद (अमरावती)वाशिम्बाकुरुमकटीबटी(अकोला)पिंपळखुटाजानुना(बुलढाणा)आंबेवनजोंधळणी (यवतमाळ)तपोवनरामनगर(वाशिम) या जैवविविधता वन उद्यानाचा यात समावेश आहे.
            शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावीत्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश