जलयुक्त शिवार अभियानातून 9523 कामे पुर्ण


67 हजार 362 पाणीसाठा निर्माण
लक्ष 10 हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण
वाशिमदि4 : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतीतील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनाचे महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयासाठी देखील उपयुक्त ठरले आहेमागील चार वर्षाच्या कालावधीत जिल्हयातील 469 गावांमध्ये या अभियानांतर्गत विविध यंत्रणेमार्फत 9249 कामे पुर्ण करण्यात आलीयामधून67 हजार 362 दशलक्ष घनमिटर (टिसीएमपाणीसाठा निर्माण झाला असून यामधून 1 लक्ष 10 हजार 552हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या या किमयेमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता आली असून शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पिकांचे उत्पन्न घेत आहेया अभियानामुळे शेतकरी रब्बी हंगामात देखील हरबरा,गहूमका व भाजीपाला वर्गीय पिके घेत आहेजलयुक्त शिवार अभियानापुर्वी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा शेतकरी आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामातील पिके घेण्यासोबतच उन्हाळी पिके घेण्याच्या तयारीत आहे.

सन 2015-16 या वर्षात जिल्हयातील 200गावांची निवड या अभियानाच्या पहिल्या वर्षी करण्यात आलीया गावातील शेत शिवारात 22 हजार 608हेक्टरवर 5057 कामे पुर्ण करण्यात आलीयामधून 34हजार 417 दशलक्ष घनमीटर (टिसीएमपाणीसाठी निर्माण झालाया पाण्यातून 68 हजार 834 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.

सन 2016-17 या वर्षात 149 गावांची निवड करण्यात आली या गावाच्या शेत शिवारात 8343हेक्टरवर 2069 कामे पुर्ण करण्यात आलीयामधून 22हजार 786 दशलक्ष घनमिटर (टिसीएमपाणीसाठा निर्माण झाला या पाण्यातून 33 हजार 178 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.

सन 2017-18 या वर्षात 120 गावात 2123कामे 8796 हेक्टरवर करण्यात आली यामधून 10हजार 159 दशलक्ष घनमिटर (टिसीएमपाणीसाठा निर्माण झालायामधून 8540 संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.

सन 2018-19 मध्ये जिल्हयातील 252 गावांची निवड करण्यात आलीयामध्ये 3124 कामे प्रस्तावीत करण्यात आली असून त्यापैकी 274 कामे 133हेक्टरवर पुर्ण करण्यात आली आहेसन 2015-16 ते2017-18 या तीन वर्षाच्या कालावधीत 469 गावांमध्ये9523 कामे पुर्ण करण्यात आली आहेत्यानुसार 67हजार 362 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला असून यामधून लक्ष 10 हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानातून सलग समतल चरमातीनाला बांधगॅबीयन बंधारेखोल सलग समतल चरलूज बोल्डर स्ट्रक्चरमाती नालाबांध दूरुस्तीशेततळेढाळीचे बांधनाला खोलीकरण व सरळीकरणसाखळी सिमेंट बंधारेसिंमेट बंधारा दूरुस्तीपाझर तलाव दूरुस्तीकोल्हापूर पध्दतीचे बंधारे दूरुस्तीपुनर्भरण चररिचार्ज शॉफ्टलोकसहभागातून गाळ काढणेवृक्ष लागवडरोपवाटीकाभूमिगत बंधारे,ठिबक सिंचनखोल खंदक आदी कामे करण्यात आली आहेया अभियानाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढली असून उत्पन्न देखील वाढण्यास मदत झाली आहे.      

जलयुक्तच्या या कामामुळे भूजलपातळी मोठया प्रमाणात वाढ झाली असून पुर्वी ऑक्टोबरमध्ये तळ गाठणाऱ्या विहिरी आता मार्चपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सहायभूत ठरणार आहेअनेक जलस्त्रोतांना सुध्दा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहेतसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास सुध्दा मदत झाली आहे.    
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे