थंडीच्या लाटेदरम्यान जनतेने खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0kZrJpEoi1bm139G1UTBMQlYI4TkR6yYnRgM4zf2bTas_ObybhRQOJozbn6_ZCbcLfZU2wJeBoViCP7A4BDkSTEmLY4cIwRIrgCceKzwoKTN9X6OTDvXvXSRcsA1btriCFp4pQu3HfVM/s1600/1672144737086245-0.png)
थंडीच्या लाटेदरम्यान जनतेने खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम, दि. 27 (जिमाका) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तरी जिल्हयातील जनतेने थंडीच्या लाटेपासुन संरक्षण करण्याकरीता खबरदारी घेणे गरजेचे आहे. या लाटेदरम्यान जनतेने पुढील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या लाटेदरम्यान काय करावे - टिव्हीवरील हवामानविषयक बातम्या बघाव्या, दैनंदिन वृत्तपत्रामधील हवामानविषयक बातम्या वाचाव्या. थंडीच्या लाटेपासून संरक्षण करण्याकरीता पुर्ण अंग झाकेल असे लोकरीचे,उबदार कपडे परिधान करावे. (शक्यतो सर्व अंग झाकलेले राहतील) डोक्यामध्ये टोपी/दुपट्टा पायामोजे व हातमोजे यांचा नियमित वापर करावा. घरात चप्पलचा वापर करावा व शक्यतो उबदार वातावरणामध्ये राहावे. या कालावधीत ताप, सर्दी व खोकला यासारखे आजार उदभवू शकतात. याकरीता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा खाजगी दवाखान्यात जाऊन वेळीच तपासणी करून उपचार करून घ्याव...