छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
· दि. ३० जून पर्यंत घेता येणार ‘वन टाईम सेटलमेंट’चा लाभ
वाशिम, दि. ०५ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यापासून वंचित
राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्यास दि. १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे.
तसेच एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे.
तसेच एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे.
राज्य शासनाने दि.
१३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम
सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर दि. १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा
प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना दिल्या आहेत. याबाबत सविस्तर माहितीसाठी
शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा.
कर्जमाफी योजनेस
पात्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत,
त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास दि. १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे. शासनाच्या दि. ७ डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार एकवेळ समझोता
योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०१८
पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत आता दि. ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तरी पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री.
कटके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment