शेतकरी बांधवांनो ! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवा जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे कृषि दिन उत्साहात साजरा


शेतकरी बांधवांनो !  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवा
      जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

कृषि दिन उत्साहात साजरा


वाशिम,दि.१ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येईल. खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते.बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारपेठेचा अभ्‍यास करून शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्याची ठरू शकते. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.आधूनिक महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो.  १ जुलैरोजी कै. वसंतरावजी नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे जिल्हा परिषद कृषि
विभाग व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांच्या संयुक्तवतीने कृषिदिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री . ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषि सभापती वैभव सरनाईक,  उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा,जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदीवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.  
  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  एस यांनी शेतक-यांनी निव्वळ शेतीवर अवलंबुन न राहता उदयोगाकडे वळुन आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले.                                          प्रास्ताविकातून कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी श्री.
सरनाईक, श्री. निकम आदींनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. 
या प्रसंगी जिल्हयातील विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी व पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा
रत्न पुरस्कार प्राप्त अधिकारी, पिक स्पर्धा विजेते शेतकरी व शेतीमध्ये नाविण्यपुर्ण प्रयोग करणारे शेतक-यांचा सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
 श्री.फडके यांनी रेशिम शेती बाबत मार्गदर्शन केले. श्री. शाहा यांनी सेंद्रिय शेती व नवयुवकांना उदयोजगतेच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती महाबळे  यांनी नैसर्गिक शेती व आत्मा अंतर्गत येणा-या योजनांची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे संचालन कृषि सहाय्यक एम. डी. सोळंके  यांनी केले तर आभार जिल्हा कृषि अधिकारी संतोष चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाकरीता जिल्हयातील प्रगतशिल शेतकरी विजय काळे जयपुर,राहुल रविराव-विळेगाव, अजय ढोक व पुजा ढोक - इंझोरी, गजानन वानखडे - शिरपुर यांच्यासह बहुतांश शेतकरी व कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप