सप्टेंबर महिन्यातील धान्य वितरणाचे परिमाण, दर जाहीर


वाशिम, दि. ०३ (जिमाका) :  जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे.

अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका १५ किलो गहू व २० किलो तांदुळ वितरीत केली जाणार आहे. याकरिता गहू प्रति किलो २ रुपये व तांदूळ प्रति किलो ३ रुपये दर राहील. प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो २ रुपये व तांदुळ ३ रुपये किलो असा दर राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे