वाशिम, दि.
०३ (जिमाका) : जिल्ह्यामध्ये
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी
व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण
जाहीर करण्यात आले आहे.
अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका
१५ किलो गहू व २० किलो तांदुळ वितरीत केली जाणार आहे. याकरिता गहू प्रति किलो २
रुपये व तांदूळ प्रति किलो ३ रुपये दर राहील. प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी
प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो
२ रुपये व तांदुळ ३ रुपये किलो असा दर राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत
पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात
येणार आहे, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment