Posts

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Image
·         कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ·         जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी टाळा, साठा करू नका वाशिम , दि. २१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या गर्दीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे किराणा, धान्य, दुध व दुग्धोत्पादन दुकाने, फळे-भाजीपाला दुकाने, मेडिकल, दवाखाने व पेट्रोलपंप या जीवनावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना २१ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या कोव्हीड-१९ या आजाराने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक   उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तर...

वाशिम जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत यात्रा, जत्रा, उत्सवांवर बंदी

·           ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना ·          यापूर्वी देण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द ·          आदेशाचे उल्लंघन केल्यास आयोजक, संयोजकांवर होणार कारवाई वाशिम , दि. १५ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा , जत्रा , उत्सव , धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. ‘कोरोना’चा संसर्ग एका संक्रमित रुग्णाकडून संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना होत असल्याने या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील यात्रा , जत्रा , उत्सव , समारंभ , सांस्कृतिक कार्यक्रम , क्रीडा स्पर्धा आदी गर्दी होणार्‍या सर्व कार्यक्रमांना १४ मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय जि...

पोहरादेवी येथे राम नवमीला होणारी यात्रा रद्द

Image
·          जिल्हा प्रशासन व विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय ·          भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येण्याचे आवाहन ·          ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी पाऊल वाशिम , दि. १३ : बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. याकरिता देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यावर्षी, २ एप्रिल २०२० रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १३ मार्च रोजी झालेल्या जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले. पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. पोहरादे...

अंडी, चिकन मानवी आहारासाठी सुरक्षित - डॉ. व्ही. एन. वानखडे

Image
·         ‘कोरोना’शी संबंध नाही ·         अफवांवर विश्वास ठेवू नका वाशिम  : कुक्कुट पक्षी व उत्पादने यांचा कोरोना विषाणू प्रदुर्भावाशी कुठलाही संबंध नाही. चिकन व अंडी मानवी आहारासाठी सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अंडी व चिकनविषयी   समाज माध्यमांवर आलेल्या अफवांमुळे कुक्कुट उत्पादन व विक्रीवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणू सांसर्गिक असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. तथापि, कुक्कुट पक्षामधून कोरोना विषाणू मानवामध्ये संक्रमित (इन्फेक्शन ब्रॉकरायटिंस) होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. आपल्याकडे चिकन व मटन हे उकळून सेवन केले जात असल्याने त्या तापमानात कोणतेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. राज्यातील कुक्कुटपालन व्यवसाय हा देशामध्ये अव्वल स्थानवर असून कुक्कुटपालन व्यवसायाशी मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी सलंग्न आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवरील अशास्त्रीय अफवा...

‘नोव्हेल कोरोना’बाबत दक्षता घ्या - जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक

Image
·         घाबरू नका; अफवांवर विश्वास ठेवू नका ·         हातांची नियमित स्वच्छता ठेवा; गर्दीमध्ये जाणे टाळा वाशिम , दि. ०५ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या तसेच आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी नोव्हेल कोरोना विषाणूविषयी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. या विषाणूचा संसर्ग टाळण्याचे उपाय सहज-सोपे असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी आज, ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, नागरिकांनी स्वतःला व इतरांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हातांची नियमित स्वच्छता राखावी. शिंकताना-खोकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरावा.   या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णा...