Posts

रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - खासदार भावना गवळी

Image
·         रस्ता सुरक्षा समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा ·         अपघातास कारणीभूत अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना वाशिम ,   दि .   १४ :   रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तथा खासदार भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सय्यद समरीन यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. गवळी म्हणाल्या, वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात...

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा - सभापती गजानन भोने

Image
·         वाशिम येथे तालुकास्तरीय पोषण अभियान कार्यशाळा ·         पाककृती स्पर्धेचे आयोजन ·         मिझल्स रुबेला, कुष्ठरोगबाबत जनजागृती ·         स्वच्छता व ‘लोकराज्य’चे महत्व विषद वाशिम ,   दि .   १४ :   जिल्ह्यातील सर्व बालके सदृढ असली पाहिजेत. एकही बालक कुपोषणाच्या श्रेणीत नसावा. घर, परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ होईल. स्वच्छता असेल तर आरोग्य चांगले राहील. आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले. आज जिजाऊ सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आणि मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आहार शिजविणाऱ्या महिलांसाठी आयोजित तालुका पोषण अभियान कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री. भोने बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मानव विकास समितीचे सदस्य सुभाष चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोह...

खा. संजय धोत्रे, किशोर तिवारी यांनी घेतला पीक कर्ज, आरोग्यविषयक सेवांचा आढावा

Image
·         पीक कर्जाबाबत उदासीन बँक अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार ·         रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेसे पिक कर्ज द्या वाशिम ,   दि. १२ :   खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप, कर्जमाफी व आरोग्य सेवेसंबंधी विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे व कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खरीप पीक कर्ज वाटपातील संथगतीबाबत खा. धोत्रे व श्री. तिवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पीक कर्ज वाटपात उदासीनता दाखविणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा अहवाल संबंधित बँकेच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके...

‘लोकराज्य’मुळे महिलांच्या विकासाला चालना - राजेश नागपुरे

Image
वाशिम ,   दि .   १२ :   शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. विशेषतः महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आहेत. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकामध्ये महिलांविषयक योजनांची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. यातील माहितीच्या आधारे अनेक योजनांचा महिला लाभ घेत आहेत. महिलांच्या विकासाला लोकराज्यमुळे गती मिळाली आहे, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले. कारंजा येथे आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्थापित अल्पसंख्याक महिला लोकसंचालीत साधन केंद्राच्या कार्यालयात आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात   मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. नागपुरे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक विजय वाहने, क्षेत्रीय समन्वयक जितेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. नागपुरे पुढे म्हणाले, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कारंजा शहरातील अल्पसंख्याक समाजातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात...

आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरील उपाय नव्हे - डॉ. अनिल कावरखे

Image
·         जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती रॅली वाशिम ,   दि. ११ :   आयुष्यातील चढउतार, अपयश यामुळे येणाऱ्या मानसिक तणावातून अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडतात. मात्र आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. आत्महत्येमुळे समस्या सुटणार नाही. त्यासाठी आत्मविश्वासाने, धैर्याने संकटाला तोंड देवून त्यावर मात केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश झरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रवींद्रकुमार अवचार, डॉ. आदित्य पांढरकर यांची उपस्थिती होती. डॉ. कावरखे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना आत्महत्येपासून परावृत्...