नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ : पालकमंत्र्यांची ग्वाही
नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ पालकमंत्र्यांची ग्वाही वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक अहवालानुसार, वाशिम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन ३९,३१० हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ८५ गावे बाधित होऊन ४८,६४५ हेक्टर क्षेत्रावर, मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित होऊन ५०,३११ हेक्टर क्षेत्रावर, मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे बाधित होऊन १०,४८९ हेक्टर क्षेत्रावर, कारंजा तालुक्यात १ गाव बाधित होऊन ५.९९ हेक्टर क्षेत्रावर तर मानोरा तालुक्यात ६ गावे...