मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
दि. 21 फेब्रुवारी, 2025
वृत्त क्र. 779
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य
-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात
स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस
संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी - तारा भवाळकर
नवी दिल्ली, दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके' असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही श्री मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली. मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले, मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे, सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत, समानता आणि समरसता आहे, मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.
गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला, जनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.
देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले, भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते, विकासाशी जोडते, भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.
मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, साहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलन, साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.
संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी - भवाळकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - पवार
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.
श्री.नहार म्हणाले, दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.
प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमिका अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0000
Marathi Language's Contribution to the Nation's Cultural Development
– Prime Minister Narendra Modi
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inaugurated with Enthusiasm in the Capital
Pride in One's Language Was Taught by Chhatrapati Shivaji Maharaj – Fadnavis
A Language That Strengthens Culture Should Unite People – Tara Bhavalkar
New Delhi, Feb 21 – Language is not just a means of communication; it is a carrier of culture. Languages are born in society and play a significant role in its formation. The Marathi language has contributed immensely to cultural development, not just in Maharashtra but across the nation, by giving expression to the thoughts of many great personalities, said Prime Minister Narendra Modi today. He emphasized that Indian languages have never been in conflict and have always enriched each other. He called for a collective responsibility to preserve and nurture languages beyond linguistic differences.
The 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan was inaugurated by Prime Minister Narendra Modi at Vigyan Bhavan, New Delhi. On this occasion, he was joined by Chief Minister Devendra Fadnavis, senior leader and conference chairman Sharad Pawar, the designated president of the conference Dr. Tara Bhavalkar, outgoing president Dr. Ravindra Shobhane, All India Marathi Sahitya Mahamandal President Prof. Usha Tambe, General Secretary Dr. Ujjwala Mehendale, Treasurer Prakash Page, and Conference Convener Sanjay Nahar, among other dignitaries.
Welcoming everyone in Marathi, Prime Minister Modi said that the Marathi Literary Conference is not just about one language; it carries the spirit of the freedom struggle and is a great cultural heritage. He noted that since 1878, many great personalities have presided over this conference, and he was honored to be connected to this tradition. He appreciated that the conference was being held in alignment with International Mother Language Day, calling it a commendable initiative. Recalling Sant Dnyaneshwar's words, "Majhya Marathachi Bolu Kautuke, Amritate Paija Jinke" (My Marathi speech is so beautiful, it surpasses nectar), he expressed his deep love for the language and shared that he has been continuously trying to learn Marathi. He also expressed great satisfaction in having had the opportunity to complete the process of granting Marathi the status of a classical language.
The Prime Minister noted that this conference coincides with significant historical anniversaries: 350 years of Chhatrapati Shivaji Maharaj’s coronation, 300 years of Punyashlok Ahilyabai Holkar’s birth anniversary, and the Amrit Mahotsav (75 years) of the Constitution drafted by Dr. Babasaheb Ambedkar. He further mentioned that 100 years ago, the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) was founded, and through it, the values of the Vedas to Swami Vivekananda have been passed on to the new generation. He expressed gratitude for his connection to Marathi language and tradition through the RSS.
"Marathi Is a Complete Language" – Modi
Prime Minister Modi described Marathi as a complete language that embodies bravery and courage, beauty and sensitivity, equality and harmony, spirituality and modernity. He emphasized that Maharashtra’s great saints brought Vedic wisdom to the masses in Marathi at a time when the nation needed spiritual guidance. Saints like Dnyaneshwar, Tukaram, Ramdas, Gadge Maharaj, Tukdoji Maharaj, and Gora Kumbhar led the Bhakti Movement, giving new direction to society. In modern times, G. D. Madgulkar and Sudhir Phadke’s "Geet Ramayan" left a profound impact on society.
During centuries of foreign rule, the Marathi language became a symbol of resistance and the cry for freedom. Chhatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, and Bajirao Peshwa pushed back invaders, while Vasudev Balwant Phadke, Lokmanya Tilak, and Veer Savarkar shook the British Empire. Marathi literature played a vital role in awakening patriotism, inspiring people, and energizing the freedom struggle.
Praising Marathi’s contribution to social reform, Modi said that the language opened doors of liberation for the oppressed and marginalized. Visionaries like Mahatma Jyotiba Phule, Savitribai Phule, Maharshi Karve, and Dr. Babasaheb Ambedkar used Marathi to introduce new ideas and drive social transformation. The language also pioneered Dalit literature, blending ancient wisdom with scientific thought. Maharashtra has embraced progressive ideas, making Mumbai the country’s financial capital and a hub for both Marathi and Hindi cinema.
"Linguistic Diversity Is the Strength of National Unity"
Prime Minister Modi emphasized that India’s linguistic diversity is a pillar of national unity, and Marathi exemplifies this beautifully. He likened language to a mother that nurtures new thoughts, connects people to development, and does not discriminate. Marathi has always welcomed literature from other languages while also enriching them in return. Many outstanding works have been translated into Marathi, just as many Marathi masterpieces have been translated into other languages. He stressed the need to further this spirit of inclusivity.
Prioritizing Higher Education in Marathi
Highlighting the importance of education in one's mother tongue, Modi noted that higher education is now being prioritized in all major Indian languages, including Marathi. He assured that Maharashtrian youth will now be able to pursue higher education in their native language.
Recognizing the role of literature in shaping society, he emphasized that literary conferences and institutions play a crucial part in national development. He expressed confidence that the All India Marathi Sahitya Mahamandal would continue the legacy set by Maharashtra’s great personalities.
Finally, he urged the promotion of young writers contributing to Marathi literature through social media and encouraged organizing literary competitions for the youth.
"Pride and insistence in one's own language learned from Shivaji Maharaj – Fadnavis"
After Marathi was accorded the status of a classical language, Chief Minister Fadnavis remarked that it is a matter of pride for everyone that this conference is being held in Delhi. He added that the dream of Marathi people all over the world has been fulfilled on this occasion. When foreign invaders attempted to tarnish our language, Shivaji Maharaj decided to use Marathi in administration. He initiated the tradition of replacing all Persian and Urdu words with Marathi ones. We have learned the pride and insistence in our own language from Chhatrapati Shivaji Maharaj.
Fadnavis further recalled that at the Tal Katora Stadium—where the conference is taking place—the Marathas had established their encampment and conquered Delhi in 1737. Now, he said, our Marathi people will conquer Delhi with their ideas. As P. L. Deshpande once stated at the World Marathi Conference, one who loves his mother tongue develops affection and tenderness, and consequently, also loves other languages. Marathi has embraced everyone as its own. It has flourished as a people's language, and the emergence of folk literature has enriched it further. The saints enriched the Marathi language even more. Art, literature, and culture are deeply embedded in the Marathi identity. That is why various literary conferences are held in Maharashtra, providing space for regional dialects as well.
He concluded by noting that the Marathi Literary Conference in Delhi offers everyone an opportunity to serve the language, and he expressed his confidence that this convention will go down in history, with even the 100th convention being celebrated in a grand manner.
The Language That Strengthens Culture Should Connect People – Bhavalkar
The Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan is a confluence of various dialects, and the idol of Lord Vitthal presented to the Prime Minister symbolizes the liberal culture of Maharashtra, stated Dr. Tara Bhavalkar. She emphasized that the importance of the Marathi language was established by Saint Dnyaneshwar and Saint Eknath. Before Chhatrapati Shivaji Maharaj established his kingdom, the saints had already created a favorable environment for it. The saints preserved the Marathi language, which must be an integral part of life. Language is a living entity; it survives only when spoken.
Maharashtra's saints kept Marathi alive by enabling people to remember Lord Pandurang through the language. The day a mother sang the first lullaby (Ovi) for her child, Marathi may have been born. Saints communicated with Vitthal in Marathi. They were truly progressive thinkers, and their contributions gave Marathi its classical status. Since Marathi was spoken widely, Shivaji Maharaj was able to gather Mavalas (soldiers) from villages and remote areas.
Language is the foundation of culture. It should unite people, not divide them. The selection of a conference president should be based on merit rather than gender. Maharashtra has remained influential through its thoughts and literature, and Bhavalkar expressed the hope that the literary conference would spread a message of love and unity.
Great Responsibility on Writers in the Present Era – Sharad Pawar
Since this is the first literary conference after Marathi received the status of a classical language, and Prime Minister Narendra Modi himself is inaugurating it, Sharad Pawar expressed his special joy and gratitude toward Modi for his support in achieving this status for Marathi.
He highlighted that Marathi writers have consistently upheld the tradition of inclusivity, which has been ingrained since the time of the saints. The contributions of women writers have further enriched Marathi literature. Writers have always guided society, and their responsibility has now increased even more. They must lead society toward constructive and progressive reforms.
To keep the younger generation connected with books, modern digital platforms and creative techniques must be utilized. If literature remains engaging for young minds, its future will be secure. More women should be given leadership roles, as this will further accelerate the tradition of women in literature.
Pawar also pointed out that literature and politics have always been interconnected and mutually supportive.
A Conference Highlighting the Importance of Writing and Libraries – Nahar
Sanjay Nahar stated that the Delhi-based literary conference is an opportunity to emphasize the importance of writing and libraries. He remarked that the Prime Minister’s presence at the event would be recorded in golden letters in Maharashtra’s history. This conference serves as a foundation for Maharashtra’s constructive role in nation-building.
Inauguration and Conclusion of the Conference
In the opening address, Mrs. Usha Tambe provided insights into the conference’s organization. She noted that this event would strengthen the connection between Marathi culture and the nation's capital.
The program began with the lighting of lamps by dignitaries and the chanting of the Navkar Mantra by Rukaiyya Maqbool. Shamika Akhtar presented the Maharashtra Geet, and the event concluded with Sant Dnyaneshwar’s Pasaydan.
Prominent personalities, including Union Minister of State Prataprao Jadhav, Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Former Home Minister Sushilkumar Shinde, Former Lok Sabha Speaker Shivraj Patil Chakurkar, and Vinay Sahasrabuddhe, were present at the occasion.
000
मराठी से राष्ट्र की सांस्कृतिक निर्माण का महान कार्य
– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राष्ट्रीय राजधानी में अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का उत्साहपूर्ण उद्घाटन
स्वभाषा के अभिमान की सीख छत्रपति शिवाजी महाराज से - फडणवीस
संस्कृति की शक्ति रखने वाली भाषा को लोगों को जोड़ना चाहिए - तारा भवाळकर
नई दिल्ली, 21 फरवरी: भाषा केवल संवाद का माध्यम नहीं होती, बल्कि यह संस्कृति की संवाहक होती है। भाषाएं समाज में जन्म लेती हैं और समाज के निर्माण में बड़ी भूमिका निभाती हैं। मराठी भाषा ने न केवल महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में महान व्यक्तियों के विचारों को अभिव्यक्ति देकर सांस्कृतिक निर्माण का महान कार्य किया है। यह गौरवोद्गार आज देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने व्यक्त किए। उन्होंने कहा कि भारतीय भाषाओं में कभी कोई वैरभाव नहीं रहा। सभी भाषाओं ने एक-दूसरे को समृद्ध किया है, और भाषाई भेदभाव से दूर रहकर भाषाओं को संरक्षित करना हम सभी की सामूहिक जिम्मेदारी है।
नई दिल्ली के विज्ञान भवन में आयोजित 98वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सम्मेलन के स्वागताध्यक्ष शरद पवार, नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, पूर्व अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महासभा की अध्यक्ष प्रो. उषा तांबे, महासचिव डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, सम्मेलन के निमंत्रक संजय नहार सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उपस्थित जनसमूह का मराठी में स्वागत करते हुए कहा कि मराठी साहित्य सम्मेलन केवल एक भाषा तक सीमित नहीं है, बल्कि इसमें स्वतंत्रता संग्राम की सुगंध और एक समृद्ध सांस्कृतिक विरासत समाहित है। उन्होंने कहा कि 1878 से अब तक कई महान विभूतियों ने इस सम्मेलन की अध्यक्षता की है, और इस परंपरा से जुड़ने का अवसर मिलना उनके लिए सौभाग्य की बात है। जागतिक मातृभाषा दिवस के अवसर पर यह सम्मेलन आयोजित किया जाना अत्यंत सराहनीय है। प्रधानमंत्री ने संत ज्ञानेश्वर के शब्दों को उद्धृत करते हुए कहा, "माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके।" उन्होंने यह भी कहा कि उन्हें मराठी भाषा से अत्यधिक प्रेम है और वह इसे सीखने का प्रयास लगातार कर रहे हैं।
उन्होंने यह भी कहा कि मराठी को अभिजात भाषा का दर्जा देने का कार्य पूर्ण करने का अवसर पाकर उन्हें अत्यंत संतोष हुआ है। प्रधानमंत्री ने कहा कि इस वर्ष छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की 300वीं जयंती, और डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधान के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में यह सम्मेलन हो रहा है। उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 100वीं वर्षगांठ का उल्लेख करते हुए कहा कि वेदों से लेकर स्वामी विवेकानंद के विचारों तक को नई पीढ़ी तक पहुंचाने का संस्कारयज्ञ निरंतर जारी है।
प्रधानमंत्री ने मराठी भाषा को पूर्ण और समृद्ध बताते हुए कहा कि इसमें शौर्य और वीरता, सौंदर्य और संवेदना, समानता और समरसता, आध्यात्म और आधुनिकता, शक्ति, भक्ति और युक्ति सभी तत्व समाहित हैं। उन्होंने कहा कि जब देश को आध्यात्मिक ऊर्जा की आवश्यकता थी, तब महाराष्ट्र के संतों ने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, गोरा कुंभार जैसे संतों के माध्यम से समाज को नई दिशा दी।
मराठी भाषा केवल संवाद का माध्यम नहीं, बल्कि स्वतंत्रता और क्रांति की आवाज रही है। यह विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने व्यक्त किए। उन्होंने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज और बाजीराव पेशवा ने मराठी भाषा को अपनी प्रशासनिक और युद्धनीति का हिस्सा बनाकर आक्रमणकारियों को पीछे हटने पर मजबूर किया। भारत के स्वतंत्रता संग्राम में वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक और वीर सावरकर जैसे क्रांतिकारियों ने अंग्रेजों की सत्ता को चुनौती दी, और मराठी साहित्य ने राष्ट्रभक्ति की भावना को प्रज्वलित कर नई ऊर्जा दी।
प्रधानमंत्री ने मराठी भाषा के सामाजिक सुधारों में योगदान को रेखांकित करते हुए महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के कार्यों की सराहना की। उन्होंने कहा कि मराठी साहित्य ने दलित समाज के उत्थान में महत्वपूर्ण भूमिका निभाई, जिससे वंचित वर्गों को अपनी आवाज बुलंद करने का अवसर मिला। मराठी भाषा ने न केवल प्राचीन विचारों को सहेजा, बल्कि विज्ञान और आधुनिकता को भी अपनाया। महाराष्ट्र ने हमेशा प्रगतिशील विचारों को स्वीकार किया, और इसी कारण मुंबई आज देश की आर्थिक राजधानी बनी है। मुंबई ने मराठी के साथ-साथ हिंदी फिल्म उद्योग (बॉलीवुड) को भी नई ऊंचाइयों तक पहुंचाया।
भाषाई समरसता का प्रतीक है मराठी
प्रधानमंत्री ने कहा कि भारत की भाषाई विविधता ही उसकी एकता का मजबूत आधार है, और मराठी भाषा इसका सबसे अच्छा उदाहरण है। "भाषा मां के समान होती है, जो अपने बच्चों को नया विचार देती है, विकास से जोड़ती है और भेदभाव नहीं करती।" मराठी भाषा ने अन्य भाषाओं से साहित्य को आत्मसात किया और स्वयं भी अन्य भाषाओं को समृद्ध किया। उन्होंने कहा कि मराठी सहित सभी प्रमुख भारतीय भाषाओं में उच्च शिक्षा को बढ़ावा दिया जा रहा है, जिससे महाराष्ट्र के युवा अब मातृभाषा में उच्च शिक्षा प्राप्त कर सकेंगे।
युवाओं को साहित्य से जोड़ने की अपील
प्रधानमंत्री ने कहा कि साहित्य समाज का दर्पण होता है और साहित्यिक सम्मेलनों तथा संस्थानों की देश के विकास में महत्वपूर्ण भूमिका होती है। उन्होंने कहा कि मराठी साहित्य को डिजिटल युग में अधिक प्रासंगिक बनाने के लिए सोशल मीडिया पर सक्रिय युवाओं को प्रोत्साहित किया जाना चाहिए। साथ ही, युवाओं के लिए साहित्यिक प्रतियोगिताओं का आयोजन करने का भी आह्वान किया। उन्होंने यह विश्वास व्यक्त किया कि मराठी साहित्य और भाषा की समृद्ध परंपरा को आगे बढ़ाने का कार्य साहित्य मंडलों और संस्थाओं के माध्यम से सफलतापूर्वक किया जाएगा।
शिवाजी महाराज से सीखा स्वभाषा का अभिमान –फडणवीस
मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलने के बाद दिल्ली में आयोजित हो रहे मराठी साहित्य सम्मेलन को गर्व का विषय बताते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह वैश्विक मराठी समुदाय के सपने के साकार होने जैसा है।
मुख्यमंत्री ने कहा कि विदेशी आक्रांताओं द्वारा भाषा को प्रदूषित करने के प्रयासों के बावजूद छत्रपति शिवाजी महाराज ने अपने प्रशासन में मराठी भाषा को प्राथमिकता दी। उन्होंने फारसी और उर्दू के शब्दों को हटाकर मराठी शब्दों को अपनाने की परंपरा शुरू की। उन्होंने कहा, "स्वभाषा के प्रति गर्व और आग्रह हमें शिवाजी महाराज से ही मिला है।"
संमेलन स्थल तालकटोरा स्टेडियम का ऐतिहासिक महत्व बताते हुए फडणवीस ने कहा कि 1737 में मराठों ने यहीं छावनी डालकर दिल्ली पर विजय प्राप्त की थी। अब मराठी विचारों की शक्ति से दिल्ली एक बार फिर जीती जाएगी।
उन्होंने प्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे के शब्दों को याद करते हुए कहा कि "जो अपनी मातृभाषा से प्रेम करता है, वही दूसरी भाषाओं को भी सम्मान देता है।" मराठी भाषा ने सभी को अपनाया है और लोकभाषा के रूप में इसकी समृद्धि संत साहित्य और लोकसंस्कृति से जुड़ी हुई है।
फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र में लगातार होने वाले साहित्य सम्मेलनों में विभिन्न बोली भाषाओं को स्थान दिया जाता है, जिससे मराठी की विविधता बनी रहती है। उन्होंने आश्वासन दिया कि यह अधिवेशन ऐतिहासिक रहेगा और 100वें अधिवेशन को भी भव्य रूप में मनाया जाएगा।
संस्कृति की शक्ति रखने वाली भाषा को लोगों को जोड़ना चाहिए – भवाळकर
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन विभिन्न बोलियों का संगम है, और प्रधानमंत्री को भेंट की गई विठ्ठल की मूर्ति महाराष्ट्र की उदार संस्कृति का प्रतीक है, ऐसा उल्लेख करते हुए डॉ. तारा भवाळकर ने कहा कि मराठी भाषा का महत्व संत ज्ञानेश्वर और संत एकनाथ ने बताया है। छत्रपति शिवाजी महाराज के राज्य की स्थापना से पहले संतों ने इसके लिए अनुकूल वातावरण तैयार किया था। मराठी भाषा को संतों ने जीवित रखा। भाषा जीवन का हिस्सा होनी चाहिए। यह एक जैविक तत्व है, जिसे यदि बोला जाए तो वह जीवित रहती है।
महाराष्ट्र में संतों ने लोगों को पांडुरंग की भक्ति मराठी भाषा के माध्यम से करवाई, जिससे यह भाषा जीवंत बनी रही। जिस दिन किसी माँ ने अपने बच्चे के लिए पहली lullaby (ओवी) गाई होगी, उसी दिन मराठी भाषा जन्मी होगी। संतों ने विठ्ठल से संवाद भी मराठी में ही किया। संत वास्तव में प्रगतिशील विचारों वाले थे। इन सभी कारणों से मराठी भाषा को अभिजात्यता प्राप्त हुई। मराठी भाषा बोली के रूप में फैली, जिससे शिवाजी महाराज को गाँवों और दूरस्थ क्षेत्रों से मावले मिले।
भाषा संस्कृति की नींव होती है। भाषा को जोड़ने वाला तत्व होना चाहिए, तोड़ने वाला नहीं। सम्मेलन की अध्यक्ष चुने जाने में महिला होने की बजाय गुणवत्ता को प्राथमिकता दी जानी चाहिए। महाराष्ट्र ने विचारों और साहित्य के माध्यम से दिल्ली के तख्त को प्रभावित किया है। उन्होंने यह भी आशा व्यक्त की कि साहित्य सम्मेलन के माध्यम से प्रेम और सौहार्द का संदेश दिया जाए।
वर्तमान समय में साहित्यकारों पर बड़ी जिम्मेदारी – शरद पवार
मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिलने के बाद यह पहला साहित्य सम्मेलन दिल्ली में हो रहा है, और इसका उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों होने पर शरद पवार ने विशेष हर्ष व्यक्त किया। उन्होंने मराठी को अभिजात भाषा का दर्जा दिलाने के लिए प्रधानमंत्री मोदी के प्रयासों की सराहना की।
उन्होंने कहा कि मराठी साहित्यकारों ने संत परंपरा से ही समावेशी विचारों को आगे बढ़ाने का कार्य किया है। महिला साहित्यकारों के योगदान से मराठी साहित्य और अधिक समृद्ध हुआ है। साहित्य ने समाज को दिशा देने का कार्य किया है। साहित्यकारों की जिम्मेदारी और अधिक बढ़ गई है, और उन्हें समाज सुधारकों के सकारात्मक मार्ग पर समाज का नेतृत्व करना चाहिए।
नई पीढ़ी को पुस्तकों से जोड़ने के लिए आधुनिक तकनीकों और डिजिटल माध्यमों का रचनात्मक उपयोग किया जाना चाहिए। यदि युवा पीढ़ी में साहित्य के प्रति रुचि बनी रही, तो साहित्य का भविष्य सुरक्षित रहेगा। यदि महिलाओं को अध्यक्ष पद के अवसर अधिक मिले, तो महिला साहित्यकारों की परंपरा और अधिक गति से आगे बढ़ेगी।
उन्होंने यह भी कहा कि राजनीति और साहित्य के बीच संबंध ऐतिहासिक रूप से हैं और वे एक-दूसरे के पूरक हैं।
लेखन और पुस्तकालयों के महत्व को रेखांकित करने वाला सम्मेलन – नहार
संजय नहार ने कहा कि दिल्ली में आयोजित यह साहित्य सम्मेलन लेखन और पुस्तकालयों के महत्व को उजागर करने का एक अवसर है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री द्वारा उद्घाटन किया जाना महाराष्ट्र के इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा। यह सम्मेलन देश के विकास में महाराष्ट्र की सकारात्मक भूमिका की नींव को और मजबूत करने का कार्य करेगा।
सम्मेलन का शुभारंभ और समापन
प्रारंभिक भाषण में श्रीमती उषा तांबे ने सम्मेलन के आयोजन की विस्तृत जानकारी दी। उन्होंने कहा कि यह सम्मेलन मराठी मन को देश की राजधानी से और अधिक निकट लाने वाला आयोजन है।
कार्यक्रम का शुभारंभ मान्यवरों द्वारा दीप प्रज्वलन और रुकय्या मकबूल द्वारा नवकार मंत्र के उच्चारण से हुआ। शमिका अख्तर ने महाराष्ट्र गीत प्रस्तुत किया। समापन संत ज्ञानेश्वर के पसायदान के साथ हुआ।
इस अवसर पर केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद अध्यक्ष प्रो. राम शिंदे, पूर्व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभा के पूर्व अध्यक्ष शिवराज पाटिल चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
000
Comments
Post a Comment