वाशिम जिल्ह्याची ‘शेती क्रांती’: जलतारा अभियान आणि चिया शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
वाशिम जिल्ह्याची ‘शेती क्रांती’: जलतारा अभियान आणि चिया शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वाशिम, दि.२४ मे (जिमाका) चिया हे वाशिम जिल्ह्याच्या ‘आकांक्षित’ ते ‘प्रेरणादायी’ या प्रवासातील उत्कृष्ट उदाहरण होय. जिल्ह्याने चिया बीज शेतीत घेतलेली ही क्रांतिकारी झेप संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, चिया शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जलतारा उपक्रम आणि चिया शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्यास मदत झाली आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे इतर जिल्ह्यांनीही अनुकरण करावे, अशी अपेक्षा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. दि.२२ मे रोजी मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा आणि आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे उपस्थित होत्या. कृषी मंत्री पुढे म्हणाले, जलतारा आणि चियाचा हा अभिनव प्रयोग संपूर्ण राज्यात आपण राबविणार आहोत. त्या...