Posts

Showing posts from July, 2024

१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमांतर्गत लवकरच हाेणार शस्त्रक्रिया

Image
१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमांतर्गत लवकरच हाेणार शस्त्रक्रिया वाशिम,दि.१८ जुलै (जिमाका) जिल्हा सामान्य रूग्णालयात हृदयाचा त्रास हाेत असलेल्या १७० बालकांचे टू डी इकाे करण्यात आले. यामध्ये ३७ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असुन, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमांतर्गत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी दिली. सन २०२४ मध्ये पहिल्यांदाच इतक्या माेठ्या प्रमाणात बालकांची तपासणी करण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे याचे वेळीच याेग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मतःच हृदयविकार हाेतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास हाेणे, धाप लागणे यासारखी लक्षणे आढळुन येतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयाेगटातील मुलांचे वेळीच निदान करू...

स्टॉप डायरिया" विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वय ठेवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय स्टॉप डायरिया कॅम्पिंगचे उत्साहात उद्घाटन

Image
"स्टॉप डायरिया"  विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वय ठेवावा        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय स्टॉप डायरिया कॅम्पिंगचे  उत्साहात उद्घाटन वाशिम, दि.१८ जुलै (जिमाका) कुपोषणमुक्ती या अभियानात वाशिम जिल्हा राज्यात प्रथम आला आहे ही बाब निश्चितच आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढवणारी आहे.  आता 'स्टॉप डायरिया' या मोहिमेचा आजपासून   जिल्ह्यात शुभारंभ होत आहे.हे अभियान ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी या अभियानाला उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज येथे केले.                               अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. किंबहुना बालमृत्यू होणार नाही यासाठी प्रत्येक यंत्रणेने सजग असावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी य...

आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम : जिल्ह्यात संपूर्णता अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम :  जिल्ह्यात संपूर्णता अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम, दि.५ जुलै (जिमाका)  नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्हा आणि मालेगाव तालुका यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शिक्षण, पोषण आहार आणि सामाजिक विकास याबाबतीत जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच उर्वरित गरोदर मातांचे १२ आठवड्यात नोंदणी करणे आणि माती परीक्षण पत्रिका वितरण करणे हे दोन उद्दिष्टे येत्या तीन महिन्यात शंभर टक्के साध्य करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज केले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात निती आयोगामार्फत संपूर्णता अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी केले. यावेळी नीती आयोगाचे डेटा एनलायझर हर्षद सिंग तसेच जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह,आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  कृषी विभागामार्फत मृ...

शेतकरी बांधवांनो ! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवा जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे कृषि दिन उत्साहात साजरा

Image
शेतकरी बांधवांनो !  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवा       जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे कृषि दिन उत्साहात साजरा वाशिम,दि.१ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येईल. खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते.बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारपेठेचा अभ्‍यास करून शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्याची ठरू शकते. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.आधूनिक महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो.  १ जुलैरोजी कै. वसंतरावजी नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे जिल्हा परिषद कृषि विभाग व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांच्या संयुक्तवतीने कृषिदिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री . ठाकरे बोलत होते. यावेळी...

खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व गोदाम सुस्थितीत करा शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने साठवण करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व गोदाम सुस्थितीत करा शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने साठवण करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस वाशिम,दि.१ जुलै (जिमाका) शेतकऱ्यांच्या उत्पादन साठवणुकीसाठी गोदाम हे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गोदाम खरीप हंगामापूर्वी सुस्थितीत आणि दुरुस्त करून घ्या , तसेच या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना प्राधान्याने त्यांची उत्पादने ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे हे सुनिश्चित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज जिल्ह्यातील गोदामांविषयी आयोजित आढावा बैठकीत दिले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम  उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा उपनिबंधक महेश कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोदामात साठवणीसाठी ठेवलेल्या उत्पादनाच्या आधारे शेतकऱ्यां...

लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस वाशिम,दि.१ जुलै (जिमाका) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने जर बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येणार नसलेबाबत शासनाकडुन सुचित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.