Posts

Showing posts from May, 2024

पावसाळ्याच्या काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

Image
पावसाळ्याच्या काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा         निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे  एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षणाचे धडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार        वाशिम, दि. २८ (जिमाका) : पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून संपर्क, संवाद ठेवावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये हानी होणार नाही हे बघावे. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर आज २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिमच्या वतीने एक दिवशीय मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री . घुगे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री. नप्ते, कारंजा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे, अग्नीशमन अधिकारी अक्षय तिरपुडे, पोलिस उपनिरीक्षक श्री झुंगे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध.. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.. शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

*शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध*                        *जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस* *शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न* *वाशिम ,दि.१७ मे (जिमाका)* शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाची व्याप्ती व विविध स्तरावर नियोजन करून  जिल्हा आत्महत्या मुक्त व बालविवाह मुक्त करण्यासाठी शेतकरी आत्मबल कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले. आज १७ मे २०२४ रोजी नियोजन भवन वाशिम येथे शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रम अंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.   कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी श्री खुळे , वाशिम तालुका कृषी अधिकारी  अतुल जावळे,  कायदा तथा परिविक्षा अधिकारी  जीनसाजी चौधरी ,जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मनोविकार तज्ञ  डॉ.श्वेता मोरवाल (ठाकूर), जिल्हा कौशल्य व...

जवाहर नवोदय विद्यालयाचे नेत्रदीपक यश • इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल

Image
जवाहर नवोदय विद्यालयाचे नेत्रदीपक यश  • इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल वाशिम,दि.16 मे (जिमाका) केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. इयत्ता बारावीत कृष्णा गणेश घुगे 94.83% यांनी प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक रवींद्र गोपाल राऊत 94. 67% तृतीय क्रमांक हर्षद रामराव भोयर 94.33% व तनिष्क राजकुमार पडघान यांनी 94.33% गुण मिळविले. दहावी मध्ये प्रथम क्रमांक अनुष्का भास्कर नागरगोजे, अथर्व विजय केकन, भक्ती भारत नरवाडे या तिन विद्यार्थ्यांनी  96. 60% गुण मिळविले. द्वितीय क्रमांक आर्यन मदन खाडे, नयन भारत शिंदे ,सुजल नितेश जाधव 96.20% गुण या तीनही विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. तृतीय क्रमांक गणेश सागर भेलांडे यांनी 94.60% गुण घेतले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशात प्राचार्य सचिन खरात,उपप्राचार्य  सुभाष लष्करी व सर्व शिक्षक, अन्य कर्मचाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

सर्व शासकीय कार्यालये व शाळा तंबाखू मुक्त करा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे

Image
सर्व शासकीय कार्यालये व शाळा तंबाखू मुक्त करा       मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे वाशिम,दि.16 मे (जिमाका) तंबाखू व तंबाखूजण्य पदार्थाच्या सेवनामुळे व धुम्रपान केल्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. कर्करोग, हृदयविकार, हृदयाशी निगडीत रोग,फुफुसाचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमध्ये ८ ते ९ लाख मृत्यू तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे होतात. धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनापासून तरुणांना व जनसामान्यांना दूर ठेवन्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधात्मक कायदा २००३ तयार केला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कलम ४ सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी,कलम ६ अ १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकण्यास बंदी,तसेच कलम ६ ब शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे.या कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे. ३१ मे जागतिक तंबाखू नकार दिनाच्या अनुषंगाने जिल...

नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या..विजेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये..याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या विजेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम,दि.16 मे (जिमाका)जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसामध्ये विजेपासून स्वतःला वाचवायचे असेल तरअशा पद्धतीने घ्या काळजी! विजा चमकत असताना टाळा या गोष्टी जेव्हा जून महिन्याचा म्हणजेच मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होताना आपल्याला दिसून येतो. अगदी त्याच पद्धतीने अवकाळी पावसाचे जेव्हा परिस्थिती उद्भवते त्यावेळी मात्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट होत असतो व अशाप्रसंगी बऱ्याचदा वीज पडण्याच्या घटना घडतात व यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते.       जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होत असून अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी विजा पडून जनावरे आणि माणसे देखील मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. अशा प्रसंगी खास करून शेतकरी ...

आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या, दिरंगाई निदर्शनास आल्यास कारवाईमानसूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे निर्देश

Image
आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या, दिरंगाई निदर्शनास आल्यास कारवाई मानसूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे निर्देश वाशिम,दि.१४ मे (जिमाका) आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना सर्व विभागांनी प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित असून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी आज जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत दिल्या. या आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,राजेंद्र जाधव,  कैलास देवरे, सर्व तहसीलदार व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील धोकादायक इमारती व भिंती शोधुन त्या पाडाव्यात,होर्डिंग स्ट्रकचर सुस्थितीत असल्याचे नगर प्रशासनाने अहवाल सादर करावे,पिण्याच्या पाण्याच्या टाक्...

पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते राष्ट्रध्वजारोहण

Image
पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते राष्ट्रध्वजारोहण वाशिम दि.०१ मे (जिमाका) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला.जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी, तहसीलदार निलेश पळसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.               ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी  महाराष्ट्र दिनाचा ...