Posts

लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढलेले सेनानीआजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहेत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींचा तालुकास्तरावर सन्मान ; चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन

Image
लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढलेले सेनानी आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहेत      निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींचा तालुकास्तरावर सन्मान ; चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन  वाशिम, दि. २५ जून, (जिमाका) –आणीबाणी काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी लोकशाही लढ्यातील बंदिवास भोगलेल्या सेनानींचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी  विश्वनाथ घुगे यांनी केले.      देशातील १९७५ साली लागु झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा वाशिम , मालेगाव व मंगरूळपीर तहसील कार्यालयात सन्मान करण्यात आला.तसेच  आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींच्या  सन्मानार्थ चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संबोधित करतांना श्री. घुगे बोलत होते.       यावेळी दि. २५ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन परिसरात आयोजित आणीबाणी काळात...

वाशिम जिल्ह्याची ‘शेती क्रांती’: जलतारा अभियान आणि चिया शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

Image
वाशिम जिल्ह्याची ‘शेती क्रांती’: जलतारा अभियान आणि चिया शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय     कृषी मंत्री माणिकराव कोकाटे  वाशिम, दि.२४ मे (जिमाका) चिया हे वाशिम जिल्ह्याच्या ‘आकांक्षित’ ते ‘प्रेरणादायी’ या प्रवासातील उत्कृष्ट उदाहरण होय. जिल्ह्याने चिया बीज शेतीत घेतलेली ही क्रांतिकारी झेप संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, चिया शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जलतारा उपक्रम आणि चिया शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्यास मदत झाली आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे इतर जिल्ह्यांनीही अनुकरण करावे, अशी अपेक्षा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. दि.२२ मे रोजी मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा आणि आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे उपस्थित होत्या. कृषी मंत्री पुढे म्हणाले, जलतारा आणि चियाचा हा अभिनव प्रयोग संपूर्ण राज्यात आपण राबविणार आहोत. त्या...

शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रभावी व्यासपीठ पालकमंत्री दत्तात्रय भरणे ..शेतकरी बांधवांसाठी वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' कार्यान्वित

Image
'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रभावी व्यासपीठ       पालकमंत्री दत्तात्रय भरणे  शेतकरी बांधवांसाठी  वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' कार्यान्वित  वाशिम, दि. २४ मे (जिमाका) शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष हे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय ठरेल. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि आधुनिक विपणन प्रणालींचा उपयोग करून स्वतःचे उत्पन्न वाढवावे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील शेतीला बाजारपेठेचे सक्षम दालन मिळावे, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि त्यांच्या मालाचे मूल्यवर्धन व्हावे यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून सोयाबीन, तूर, गहू, कापूस, चिया, हळद, फळे आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र वि...

500 जलतारे पूर्ण करणाऱ्या गावांना 'Coffee with Collector' ची सुवर्णसंधी

500 जलतारे पूर्ण करणाऱ्या गावांना  'Coffee with Collector' ची सुवर्णसंधी! वाशिम,दि.21 मे (जिमाका) जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या ‘जलतारा’ अभियानात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या गावांसाठी एक विशेष सन्मान दिला जाणार आहे. 500 किंवा त्याहून अधिक जलतारे पूर्ण करणाऱ्या सन्माननीय सरपंच , उपसरपंच, तलाठी , ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील,ग्राम रोजगार सेवक,वॉटर हिरो यांना  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासमवेत त्यांच्या निवासस्थानी ‘Coffee with Collector’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. हा कार्यक्रम 26 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात सहभागी होण्यासाठी दिनांक 24 मे 2025 पर्यंत 500 जलतारे पूर्ण करून त्यांचे Geo-tagging करणे अनिवार्य आहे. ही संधी जलतारा कार्यात पुढाकार घेतलेल्या ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. जिल्ह्यातील जलसंपत्तीची प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.